मुंबई : दिवसभरात कोरोनाबाधित रुग्णांसह मृतांचा आकडा काहीसा कमी झाल्याचं दिसून आलं आहे. आज 2,696 नवीन रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे करोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 65,56,657 झाली आहे. कालच्या तुलनेत आज बाधित रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. तर 3,062 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.
कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या 63,77,954 इतकी आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढून 97.27 टक्के एवढं झालं आहे. आज राज्यात 49 रुग्णांचा मृत्यू झाला त्यामुळं मृतांचा एकूण आकडा 1,39,166 इतका झाला आहे. तसेच राज्यातील मृत्यूदर 2.12 टक्क्यांवर पोहोचला आहे. तर राज्यात सक्रिय रुग्णांची संख्या 35,955 इतकी झाली आहे.
नागपूर, अकोला, औरंगाबाद मंडळात एकाही मृत्यूची नोंद झाली नाही. तर ठाणे 10, नाशिक 3, पुणे 25, कोल्हापूर 9, लातूर 2 मृत्यू नोंदवले गेले. सध्या राज्यात 2,47,006 व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत तर 1,370 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.