भाजपला सत्तेचा माज आलाय : राज ठाकरे

Raj Thackeray
Raj Thackeray

पुणे : महापुरासारखी परिस्थिती राज्यात निर्माण झाली असताना हे सरकार दुर्लक्ष करतं आहे. राजकारण एके राजकारण करत बसायचं हेच या सरकारचं काम आहे. सरकारला सत्तेचा माज आला आहे. जी भीषण स्थिती आहे त्यातून सावरण्यासाठी वेळ लागणार आहे. त्यामुळे विधानसभा निवडणूक पुढे ढकलावी, अशी मागणी मनसेप्रमुख राज ठाकरेंनी केली आहे.

कोल्हापूर आणि सांगलीतील पूर परस्थितीकडे पूर्ण लक्ष देण्याची गरज आहे. त्यामुळे विधानसभेच्या निवडणुका पुढे ढकलाव्यात. याबाबत निवडणूक आयोगाला पत्र लिहिणार असल्याचेही त्यांनी मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.

पक्षप्रवेश, यात्रा यामध्ये सत्ताधारी मग्न आहेत. त्यांना जनतेच्या प्रश्नांशी काहीही देणंघेणं नाही. आम्ही अन्नाची पाकिटं वाटत असताना त्यावर मनसेची  लेबलं लावली नाहीत, असाही टोला राज ठाकरेंनी  लगावला. निवडणुकीत 220 जागा येतील असं तुम्ही छातीठोकपणे सांगता, मग एवढा पाऊस पडल्यावर काय परिस्थिती निर्माण होईल? याचा अंदाज तुम्हाला येत नाही का? असाही प्रश्न राज यांनी यावेळी उपस्थित केला. पक्ष आणि मतभेद सगळं बाजूला ठेवून जे पूरग्रस्त आहेत, त्यांना मदत केली गेली पाहिजे. नैसर्गिक संकट येतं तेव्हा अशाच धोरणाचा अवलंब करायचा असतो. मात्र या सरकारला निवडणूक आणि सत्ता उपभोगणं याशिवाय काहीही दिसत नाही.

तुम्ही लोकांना या परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी जाणार नसाल, तर मग मते मागायला कोणते तोंड घेऊन जाणार आहात? असा सवाल राज यांनी विचारला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com