गांधी कुटुंबांकडून २ हजार कोटींचा घोटाळा, फडणवीसांचा हल्लाबोल

स्वातंत्र्यसैनिकांची राष्ट्रीय संपत्ती हडप करण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे
Devendra Fadnavis
Devendra Fadnavisesakal
Summary

स्वातंत्र्यसैनिकांची राष्ट्रीय संपत्ती हडप करण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे.

२०१० साली गांधी कुटुंबाने यंग इंडियाची स्थापना केली. या कंपनीद्वारे गांधी कुटूंबियांनी स्वातंत्र्य सैनिकांचा हक्क हिरावला आहे. या कंपनीच्या दोन हजार कोटींच्या संपत्तीवर मालकी सांगत त्यांनी संपत्ती हडप केली आहे. स्वातंत्र्यसैनिकांची राष्ट्रीय संपत्ती हडप करण्याचा डाव त्यांनी रचला आहे. असा हल्लाबोल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. या घोटाळ्याप्रकरणी कोर्टाच्या नियमानुसार त्यांची ईडीकडून चौकशी सुरु आहे, असंही ते म्हणाले आहेत.

आज ते मुंबईत बोलत होते. यावेळी त्यांनी ईडी चौकशीवरून गांधी कुटुंबावर निशाणा साधला. ते म्हणाले, आज काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची ईडीत चौकशी झाली आहे. काँग्रेसने आज जनतेला वेठीस धरण्याचे काम केले आहे. ईडीची चौकशी न्यायालयाच्या निर्णयानंतर झाली आहे. सुमारे पाच हजार स्वातंत्र्यसैनिक एजेएल कंपनीचे मालक होते. राहुल गांधी आणि त्यांच्या कुटुंबाने यंग इंडियन कंपनी सुरू करुन त्यावर आपली मालकी प्रस्तावित केली. त्यानंतर त्यांनी 2 हजार कोटी रुपयांची प्रॉपर्टी हडप केली. त्यामुळे हा संपू्र्ण भ्रष्टाचार असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

Devendra Fadnavis
काँग्रेसने एक उमेदवार मागे घ्यावा अन्यथा..., महाजनांचा सल्ला

पुढे ते म्हणाले, नॅशनल हेरॉल्ड प्रकरणातील हा मोठा घोटाळा आहे. काँग्रेसकडून कार्ड घेण्याचा प्रयत्न झाला आहे. स्वातंत्र्यसैनिकांची राष्ट्रीय संपत्ती हडप करण्याचा प्रयत्न गांधी कुटुंबाने केला आहे, त्यामुळे त्यांना ईडीच्या चौकशीला सामोरे जावे लागले आहे. या कंपनीचं राष्ट्रीयीकरण होणे अपेक्षित होते, पण गांधी कुटुंबाने त्यांच्या हक्क हिरावला आहे. राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचाही अवमान केला आहे. मी सावरकर नाही त्यामुळे मी माफी मागणार नाही असं ते म्हणाले असल्याचे त्यांनी स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, राहुल गांधींनी सावरकर यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याप्रकरणी माफी मागावी, अशी मागीणीही फडवीस यांनी केली आहे. सत्तारुढ पक्षांनी ही निवडणूक बिनविरोध करावी, असा सल्ला भाजपाने त्यांना दिला होता. पाचव्या जागेसंदर्भात आम्ही रणनीती आखली आहे, त्यामुळे ही जागा कोणत्याही परिस्थितीत निवडुन आणू अशा विश्वासही यावेळ फडणवीसांनी व्यक्त केला.

Devendra Fadnavis
शेवटच्या क्षणी फडणवीसांची खेळी; सदाभाऊंचा विधान परिषदेसाठीचा अर्ज मागे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com