Devendra Fadnavis : 'जनाब बाळासाहेब ठाकरे, असं कॅलेंडर कोणी छापलं होतं?' फडणवीसांचं ठाकरेंना उत्तर

uddhav thackeray and devendra fadnavis
uddhav thackeray and devendra fadnavis SAKAL

मुंबईः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधतांना उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्र सोडलं आहे. त्यापूर्वी त्यांनी भगतसिंग कोश्यारी यांचं तोंडभरुन कौतुक केलं आहे. कोश्यारींनी महाराष्ट्रात उत्तम कार्य केलं, असं फडणवीस म्हणाले.

देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या बोलण्याचा चुकीचा अर्थ लावला. त्यांनी त्याबाबत क्लेरिफिकेशन दिलेलं होतं. परंतु मविआ नेत्यांचा त्यांच्यावर राग होता. हा चॅप्टर संपला आहे. कोश्यारींनी महाराष्ट्राची सेवा केली, त्यांचे आभार मानतो; अशा शब्दांत फडणवीसांनी भावना व्यक्त केल्या.

काही वेळापूर्वी उद्धव ठाकरे यांनी उत्तर भारतीयांच्या मेळाव्यात, भाजपला सोडलं म्हणजे हिंदुत्व सोडलं नाही असं म्हणत आमच्याकडे दोन व्यक्ती भेटल्यानंतर राम-राम घालतात. तर तुमच्याकडे जय श्रीराम म्हणातात. शेवटी राम आहेच. मी अयोध्येला जाण्यापूर्वी शिवनेरीवर गेलो होतो. तिथून माती घेतली आणि मग रामलल्लाच्या दर्शनाला गेलो. माघारी आल्यानंतर मी मुख्यमंत्री झालो, असं विधान केलं होतं.

त्याला उत्तर देतांना फडणवीस म्हणाले की, मला आनंद आहे, आता उद्धवजींना जैन समाजाची , उत्तर भारतीयांचं आठवण येतेय. कोण हिंदुत्ववादी आहे आणि कोण नाही हे जनतेला माहिती आहे. कोणी जनाब बाळासाहेब ठाकरे असं नाव लिहून उर्दूत कॅलेंडर छापलं होतं, हे सगळ्यांना माहिती आहे.

uddhav thackeray and devendra fadnavis
Uddhav Thackeray : 'अयोध्येला जाण्यापूर्वी मी एक मोठं काम केलं अन् सीएम झालो' ठाकरेंनी सांगितली आठवण

सर्व निवडणुका एकत्र घेऊन दाखवा, असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. त्याला उत्तर देतांना फडणवीस म्हणाले की, उद्धवजी सध्या सगळ्या पक्षांचे नेते झाले आहेत. त्यांनी वन नेशन वन इलेक्शन या नाऱ्याला साथ द्यावी, एवढंच आमचं म्हणणं आहे.

uddhav thackeray and devendra fadnavis
Satyajeet Tambe : थोरातांसोबतच्या बैठकीनंतर एच.के. पाटील म्हणाले, काँग्रेस हायकमांड...

काय म्हणाले होते उद्धव ठाकरे?

  • राम मंदिराचा मुद्दा खितपत पडला होता, त्यानंतर आम्ही भूमिका घेतली होती

  • हवं तर स्वतंत्र कायदा करा परंतु राम मंदिराचा प्रश्न सोडवा,अशी भूमिका शिवसेनेने घेतली होती

  • मी अयोध्येत जाण्यापूर्वी शिवनेरीवर गेलो होतो. तिथली माती प्रभू रामाकडे नेली होती

  • नंतर मी मुख्यमंत्री झालो आणि राम मंदिरही उभं राहात आहे

  • आम्ही महाराष्ट्रात राम-राम म्हणतो आणि तुमच्याकडे जय श्रीराम म्हणतात.. शेवटी राम आहेच

  • 'राष्ट्रीयत्व हेच आमचं हिंदुत्व आहे' असं बाळासाहेब म्हणायचे. हेच आमचे संस्कार आहेत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com