‘दुष्काळनिवारणाची कामे अडवू नका’ - देवेंद्र फडणवीस

Devendra-Fadnavis
Devendra-Fadnavis

मुंबई - दुष्काळी भागातील पाणीपुरवठा योजनांची दुरुस्ती, टॅंकर मंजुरी, चारा छावण्या सुरू करणे, ‘रोहयो’मधील कामे यांना आचारसंहितेची कुठलीही अडचण येणार नाही. त्यामुळे प्रशासनाने आचारसंहितेचे कारण सांगून कोणतेही प्रस्ताव थांबवू नयेत. प्रस्तावांना तातडीने मंजुरी देऊन कामे सुरू करावीत, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिले. 

मुख्यमंत्री फडणवीस यांनी आज ऑडिओ ब्रिजच्या माध्यमातून उस्मानाबाद जिल्ह्यातील सरपंच, ग्रामसेवक आणि जिल्हाधिकारी, गटविकास अधिकारी यांच्याशी संवाद साधला. जिल्ह्यातील विविध तालुक्‍यांतील अनेक ग्रामस्थांनी टॅंकरपुरवठा, चारा छावणी, रोहयोची कामे आदीसंदर्भातील स्थानिक तक्रारी थेट मुख्यमंत्र्यांना सांगितल्या. या तक्रारींवर तातडीने कार्यवाही करून अहवाल देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी, तहसीलदार व गटविकास अधिकारी यांना मुख्यमंत्र्यांनी दिल्या. सरपंचांशी संवाद साधताना मुख्यमंत्री म्हणाले की, राज्य शासनाने दुष्काळाची नोंद घेऊन तातडीने उपाययोजना सुरू केल्या आहेत. दुष्काळ उपाययोजनेसंदर्भात आलेल्या तातडीच्या तक्रारींवर ४८ तासांत कार्यवाही करण्यात येईल. तसेच, दीर्घकालीन उपाययोजनांवर धोरणात्मक निर्णय घेतले जातील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com