दुसऱ्या टप्प्यातील निधी वितरित

Fund
Fund

मुंबई - गेल्या वर्षी खरीप हंगामात अपुऱ्या पर्जन्यमानामुळे दुष्काळ जाहीर केलेल्या १५१ तालुक्‍यांतील शेतकऱ्यांना पीक नुकसानपोटीचा सुमारे १ हजार ४५४ कोटी रुपयांचा दुसरा हप्ता आज राज्य शासनाने वितरित केला असल्याची माहिती मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव किशोरराजे निंबाळकर यांनी दिली.

केंद्राच्या दुष्काळ संहितेप्रमाणे राज्यातील १५१ तालुक्‍यांत राज्य शासनाने दुष्काळ जाहीर केला आहे. या तालुक्‍यातील शेतकऱ्यांना पीक नुकसानीची मदत देण्यासाठी २ हजार ९०९ कोटी ५१ लाख ९ हजार रुपयांची मदत वितरित करण्यास मान्यता दिली होती. त्यापैकी मदतीचा पहिला हप्ता यापूर्वीच देण्यात आला होता. आता उर्वरित १ हजार ४५४ कोटी ७५ लाख ५४ हजार ६८० एवढी रक्कम विभागीय आयुक्तांकडे वर्ग करण्यात आली आहे. ही रक्कम तातडीने पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

दुसऱ्या हप्त्यात कोकण विभागाला सुमारे ७.०६ कोटी, नाशिक विभागाला ४४६.४८ कोटी, पुणे विभागाला २०६.५९ कोटी, औरंगाबाद विभागास ५२५.२९ कोटी, अमरावती विभागास २३७.१८ कोटी आणि नागपूर विभागास ३२.१३ कोटी रुपये वितरित करण्यात आले असून, मार्चपूर्वी सर्व पात्र शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात पैसे जमा करण्याच्या सूचना विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांना देण्यात आल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com