बळिराजा पुन्हा संकटात

उस्मानाबाद - मराठवाडा यंदाही दुष्काळाच्या छायेत आहे. ऑगस्ट निम्मा झाला तरी अद्याप सर्वदूर समाधानकारक पाऊस झालेला नाही. कधीतरी पडलेल्या तुरळक पावसावर पेरलेले उगवले पण आता तेही वाळू लागले आहे. करंजकल्ला (ता. कळंब) येथे शेंगा लागणीच्यावेळीच वाळून गेलेले उडदा
उस्मानाबाद - मराठवाडा यंदाही दुष्काळाच्या छायेत आहे. ऑगस्ट निम्मा झाला तरी अद्याप सर्वदूर समाधानकारक पाऊस झालेला नाही. कधीतरी पडलेल्या तुरळक पावसावर पेरलेले उगवले पण आता तेही वाळू लागले आहे. करंजकल्ला (ता. कळंब) येथे शेंगा लागणीच्यावेळीच वाळून गेलेले उडदा

नांदेड - राज्यात पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे सत्र सुरू झाले असून मराठवाड्याप्रमाणेच पश्‍चिम महाराष्ट्राच्या दुष्काळी भागांतील बळीराजाही कर्जबाजारीपणा, सततची नापिकी आणि अतिवृष्टी यामुळे मृत्युला कवटाळत असल्याचे वास्तव समोर आले आहे. 

कानडखेड (ता. पूर्णा) येथील शेतकरी माणिकराव बाबाराव कोठारे (वय ६५) यांनी सततच्या नापिकीमुळे बॅंकेचे कर्ज कसे फेडावे, या विवंचनेतून गुरुवारी (ता. २२) शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली. कोठारे यांना कर्जफेडीबाबतीत बॅंकेकडून नोटीस आली होती. 

तर वैजूबाभूळगाव (ता. पाथर्डी) येथील सुरेश गंगाधर घोरपडे (वय ४२) या शेतकऱ्याने कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केली. घोरपडे यांनी सेवा संस्था, बचत गट, तसेच एका वित्तसंस्थेकडून कर्ज घेतले होते. नगर जिल्ह्यात प्रशासनाने गावातील चाराछावणी बंद केली आणि पाण्याच्या टॅंकरच्या फेऱ्या कमी केल्याने जनावरांचे हाल होत आहेत. यातून नैराश्‍य आल्याने खांडके गावातील दिव्यांग शेतकरी लक्ष्मण संपत गाडे (वय ३५) यांनी आज सकाळी गळफास घेऊन आत्महत्या केली. चाराछावण्या केल्याच्या नैराश्‍यातून झालेली गेल्या पंधरा दिवसांतील ही दुसरी आत्महत्या आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com