देशातील आर्थिक अराजकामुळे मानवी संहार- शिवसेना

BJP Shivsena
BJP Shivsena

मुंबई- 'बाराबंकी येथील बडागावात राहणार्‍या छोटूलाल या मुलाला आईवर अंत्यसंस्कार करण्यासाठीही बँकेने पैसे दिले नाहीत. 
चारशेहून अधिक लोक बँकांच्या रांगेत मरण पावले. दुसरीकडे मोदी हे आभाराचे भाषण हसतमुखाने करीत होते. पंतप्रधानांनी पाडलेला घोषणांचा पाऊस अशा छोटूलालसाठी उपयोगाचा नाही, असे सांगत देशातील आर्थिक अराजक हे मानवी संहाराला आमंत्रण देणारे आहे' अशी टीका शिवसेनेने केली आहे. 

पंतप्रधान मोदींनी नववर्षाच्या पूर्वसंध्येला देशाला उद्देशून केलेल्या भाषणावर 'सामना'च्या अग्रलेखातून जोरदार टीका करण्यात आली आहे. मोदींच्या भाषणातील अनेक मुद्दे हे यूपीएच्या काळातीलच आहेत, असे शिवसेनेने म्हटले आहे. 
'देशातील आर्थिक अराजक मानवी संहारास आमंत्रण देणार असेल तर देश वाचविण्यासाठी सत्य सांगणे हा अपराध नसून राष्ट्रभक्तीच आहे असे आम्ही मानतो.' अशी टीका 'सामना'तून करण्यात आली आहे.

मोदी हे भाषणात घोषणा करतात की धमक्या देतात अशी चिंता सगळ्यांना लागून राहिली होती. मोदी यांनी वृत्तवाहिन्यांवरून एकप्रकारे अर्थसंकल्पातील घोषणांचा पाऊस आधीच पाडल्याने अर्थमंत्री अरुण जेटली यांचा भार हलका केला. फेब्रुवारीत केंद्रीय अर्थसंकल्पात अर्थमंत्री नवे काय सांगणार, असा टिमटा सेनेने काढला आहे.

शिवसेनेने म्हटले आहे की, मोदी यांनी 8 नोव्हेंबरला नोटाबंदीचा निर्णय जाहीर करून देशाच्या अर्थव्यवस्थेला चूड लावली. या निर्णयामुळे सामान्य जनतेचे, मोलमजुरी करून जगणार्‍यांचे कंबरडे मोडले. पंतप्रधान मोदी यांच्यावर आमचा लोभ आहे व राहणारच, पण देशातील आर्थिक अराजक मानवी संहाराला आमंत्रण देणार असेल तर देश वाचविण्यासाठी सत्य सांगणे हा अपराध नसून राष्ट्रभक्तीच आहे असे आम्ही मानतो, असे शिवसेनेने म्हटले आहे.  
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com