वारकऱ्यांचा प्रस्ताव शासनानं मंजुर करायला हवा होता -खडसे

एकनाथ खडसे
एकनाथ खडसे

कोरोना महामारीमुळे गेल्या वर्षभरापासून पायी वारीवर बंधन आले आहे. त्यामुळे मोजक्याच वारकऱ्यांसह ही वारी बसमधून पंढरपूरकडे रवाना केली जाते. यंदाही पायी वारीला राज्य सरकारनं परवानगी दिली नाही. त्यामुळे यंदाची वारीही बसमधूनच पंढरपुरला जाईल. जळगावमधून संत मुक्ताईंची पालखी पंढरपूरकडे प्रस्थान करीत असते, यामध्ये हजारो दिंड्या पालख्या आणि वारकरी सहभागी होतात. पण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्यावर्षीपासून पायी पालखीला परवानगी दिली जात नाही. राज्य सरकारनं पायी पालखीला परवानगी द्यायला हवी होती, असं मत एकनाथ खडसे यांनी व्यक्त केलं आहे.

मोजक्याच लोकांना बसने परवानगी दिली जाते, तशी पायी जाताना सुद्धा कमी लोकांमध्ये परवानगी द्यायला हवी होती, अशी मागणी वारकऱ्यांची होती, असं एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे. पायी वारीचा प्रस्ताव ही वारकऱ्यांच्या वतीने शासनास देण्यात आला होता, मात्र त्यास परवानगी मिळाली नाही, असेही खडसे म्हणाले. जळगावातील मुक्ताई नगर येथून निघणाऱ्या संत मुक्ताबाई वारीची अनेक वर्षांची परंपरा पाहता आणि वारकऱ्यांची मागणी पाहता वारकऱ्यांच्या हा प्रस्ताव शासनाने मंजूर केला असता तर अधिक बरे झाले असते, असं मत खडसे यांनी व्यक्त केलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com