उमेदवाराला एवढाच खर्च करता येणार; एकही रकाना रिकामा ठेवल्यास अर्ज बाद

उमेदवाराला एवढाच खर्च करता येणार; एकही रकाना रिकामा ठेवल्यास अर्ज बाद

नवी दिल्ली : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांसाठी आजपासून (शनिवार) आचारसंहिता लागू झाली असून, महाराष्ट्रात दिवाळीपूर्वी विधानसभा निवडणुकांचे निकाल लागणार हे निश्चित झाले. आज दुपारी 12 वाजता मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी महाराष्ट्र आणि हरियानातील विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या. उमेदवाराला 28 लाख रुपये एवढाच खर्च करण्यात येणार आहे, असे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.

महाराष्ट्रात 288 जागांसाठी मतदान होत असून, 8.94 कोटी मतदार महाराष्ट्रातून मतदानाचा हक्क बजावतील. आयोगाच्या अधिकाऱ्यांनी महाराष्ट्रात जाऊन सरकारी अधिकाऱ्यांशी चर्चा करून तारखा जाहीर केल्या आहेत. महाराष्ट्र विधानसभेची मुदत 9 नोव्हेंबरला संपत आहे. उमेदवाराच्या खर्चावर लक्ष ठेवण्यासाठी महाराष्ट्रात दोन पर्यवेक्षक पाठविले जाणार आहेत. सुरक्षा व्यवस्था चोख ठेवण्यात येणार येईल. उमेदवाराने एकही रकाना रिकामा ठेवल्यास अर्ज बाद करण्यात येईल. राज्यात 1.8 लाख ईव्हीएमचा वापर करण्यात येईल. प्रचारसाहित्यात प्लास्टिकवर बंदी असेल. सर्व उमेदवारांना आपल्या जवळील हत्यारे जमा करावी लागणार आहेत, असे अरोरा यांनी सांगितले.

अधिसूचना जारी झाल्यापासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची सात दिवसांची मुदत, उमेदवारी अर्जांची छाननी, माघारीची मुदत, प्रचारासाठी 14 दिवसांचा कालावधी असेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com