माळीनगर (सोलापूर) : विनापरवानगी गाळप हंगाम सुरू केल्यामुळे राज्यातील 11 साखर कारखान्यांवर साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी कारवाई केली आहे. या सर्व कारखान्यांना मिळून 41.87 कोटी रुपयांचा दंड त्यांनी ठोठावला आहे. दरम्यान, कारवाई झालेल्या साखर कारखान्यांमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस व भाजपच्या वरिष्ठ नेतेमंडळींच्या कारखान्यांचा समावेश आहे.
शेजारच्या कर्नाटकप्रमाणे महाराष्ट्रात राज्य सरकारने जाहीर केलेल्या तारखे अगोदर साखर कारखाने चालू करण्यास परवानगी दिली जात नाही. गाळप हंगाम सुरू करण्यासाठी साखर कारखान्यांना अर्ज करून साखर आयुक्तांकडून गाळप परवाना घ्यावा लागतो, त्याशिवाय साखर कारखाने सुरू केल्यास कारखान्यांना दंडात्मक कारवाईस सामोरे जावे लागते. विनापरवाना गाळप केलेल्या उसाला साखर आयुक्त प्रतिटन 500 रुपये दंड आकारणी करू शकतात.
कारवाई झालेले साखर कारखाने व कंसात दंडाची रक्कम रुपयांत
संपादन : श्रीनिवास दुध्याल
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.