पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतलेली गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा २०२१ चा निकाल आता अधिकच वादग्रस्त ठरत चालला आहे. उत्तरतालिकेतील गडबडी संदर्भात उच्च न्यायालयाने आयोगाला फटकारले खरे, परंतु मुख्य परीक्षेला बसण्यासाठी याचिकाकर्त्यांनाच दिलासा दिला आहे. त्यामुळे उत्तरे बरोबर असलेल्या इतर उमेदवारांनी नाराजी व्यक्त केली असून, सर्वांनाच न्याय पद्धतीने दिलासा द्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे.(mpsc exam)
उत्तरतालिकेतील चुकीच्या उत्तरांचा फटका हजारो विद्यार्थ्यांना बसला असून, दिलासा मात्र याचिकाकर्त्या ८६ उमेदवारांना मिळणार आहे. याबद्दल बोलताना उमेदवार राहुल पुंडे (नाव बदललेलं) म्हणतो,"संयुक्त पूर्व परीक्षेची उत्तरतालिका तीनदा बदलली. आता न्यायालयाच्या निकालानंतर याचिकाकर्त्यांना मुख्य परीक्षेस बसू देण्याचे न्यायालयाने आदेश दिले आहे. मात्र गावाकडे माझ्यासारखे अनेक विद्यार्थ्यांना या प्रक्रियेची कल्पना नाही. याचिकेत आमचे नाव नसल्याने आम्हाला हा न्याय मिळत नाही. आयोगाने योग्य भूमिका घेत. चौथी अचूक उत्तरतालिका घोषित करून सर्वानाच न्याय द्यावा." आयोगाचा चूक लपविण्याचा प्रयत्न चालू आहे. कारण आयोगाच्या एका सचिवांनी उमेदवारांशी परस्पर संपर्क साधत परीक्षेला बसून देण्याच्या संधींबद्दल कल्पना दिल्याचे उमेदवारांचे म्हणणे आहे.
''मी पुण्यात आलो म्हणून मला याचिके संदर्भात कळाले. सुमारे तीन हजाराहून अधिक उमेदवारांना असे काठावरचे गुण आहे. त्यासर्वांवर एक प्रकारे अन्याय झाला आहे. मला ४३ गुण मिळाले आहे. मेरिट ४३.४५ गुणांचे आहे. उत्तरतालिकेतील चूक दुरुस्त केल्यावर माझे गुण ४५ होतात आणि मी मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरतो.''
- सागर पवार (नाव बदलले), उमेदवार
''फक्त ८६ मुलांनाच न्याय का? या प्रक्रियेत हजारो संख्येने विद्यार्थी बाधित झाले आहे. यात समानता कुठेच नाही. निकाल पुन्हा लावणे हेच योग्य आहे. सर्वच मुलांना समान संधी द्यावी.''
- सूरज गुज्जलवार
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.