झारीतील शुक्राचार्यांवर कारवाई व्हावी - उद्धव

Uddhav-Thackeray
Uddhav-Thackeray

मुंबई - शेतकऱ्यांसाठीच्या पीकविमा योजनेवरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेतला आहे. पीकविमा योजनेमध्ये गैरव्यवहार होत असून, अनेक शेतकरी या योजनेच्या लाभापासून वंचित राहत असल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला.

या योजनेतील झारीतील शुक्राचार्यांवर कारवाई व्हायला हवी. शेतकऱ्यांना न्याय मिळणार नसेल तर सत्ता व युती काय कामाची असा इशाराही ठाकरे यांनी दिला. मुंबईत शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या योजनेच्या प्रामाणिकतेबाबत उद्धव ठाकरे यांनी अनेक सवाल उपस्थित केले. ते म्हणाले, की जून महिन्यात पीकविमा योजनेबाबत शिवसेनेने मोर्चा काढला होता. त्यात पंधरा दिवसांची मुदत कंपन्यांना दिली होती. शिवसेनेचे सर्व खासदार याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटले आणि योजनेत काय सुधारणा करता येईल हे सांगितले. शिवसेनेने प्रत्येक  तालुक्यात पीकविमा मदत केंद्रे उभारली होती. पीकविमा योजनेत ५३ लाख शेतकरी पात्र तर ९० लाख शेतकरी अपात्र ठरवले गेले. शिवसेनेने पीकविम्याचा प्रश्न हाती घेतल्यानंतर १० लाख शेतकऱ्यांना ९६० कोटी मदत झाली. मात्र, शेतकऱ्यांना देणे असलेले २००० कोटी रुपये कंपन्यांकडे अजून पडून आहेत. ही रक्कम शेतकऱ्यांची आहे.

पीकविमा योजनेमध्ये दोन टक्के रक्कम शेतकरी भरतात, तर उर्वरित ९८ टक्के रक्कम सरकारकडून दिली जाते. मात्र, विम्याची संपूर्ण रक्कम शेतकऱ्यांना मिळत नाही. शिवसेनेकडे या योजनेबद्दल अनेक तक्रारी आल्याचे ठाकरे यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com