बळिराजासाठी बॅंकांचे दरवाजे बंदच

Farmer-Loan
Farmer-Loan

जिल्हा बँकांना हवे सहा हजार कोटी; विकास सोसायट्या अडचणीत 
सोलापूर - राज्यस्तरीय बॅंकर्स समितीच्या नियोजनानुसार यावर्षी खरीप व रब्बी हंगामात राज्यातील ४३ लाख शेतकऱ्यांना ७४ हजार कोटींच्या कर्जवाटपाचे उद्दिष्ट बॅंकांना दिले आहे. जुलैमध्ये खरीप पिकांच्या लागवडीसाठी कर्जाची सर्वाधिक मागणी होते. परंतु, नाशिक, बीड, वर्धा, जालना, बुलढाणा, नागपूर, उस्मानाबाद, सोलापूर, जालना, पुणे, सांगली, यवतमाळ या १२ जिल्हा बॅंकांचे कर्जवाटप पैशांअभावी ठप्पच असल्याची माहिती सहकार आयुक्‍तालयातील सूत्रांनी दिली.

वाढत्या थकबाकीमुळे मेटाकुटीला आलेल्या जिल्हा बॅंकांनी शेती कर्जवाटपासाठी राज्य बॅंकेकडे पाच हजार ९८२ कोटींच्या कर्जाची मागणी केली आहे. पावसाने आता कमी-अधिक प्रमाणात हजेरी लावायला सुरवात केल्याने बळिराजाला मशागत व खते-बियांणासाठी पैशांची गरज आहे. मात्र, ठप्प झालेली कर्जमाफी अन्‌ थकबाकीत गेलेल्या बॅंक खात्यामुळे ४९ लाख कर्जदारांपैकी सुमारे १७ लाख ८३ हजार शेतकऱ्यांनी कर्जाची मागणी करूनही बॅंकांकडून नव्याने कर्ज मिळाले नसल्याचे चित्र आहे. सद्यस्थितीत जिल्हा बॅंकांची शेती व बिगरशेतीची तब्बल ५४ हजार कोटींची थकबाकी झाली आहे. त्यामुळे खरीप हंगामातील उद्दिष्टानुसार आतापर्यंत जिल्हा बॅंकांनी ३० टक्‍केदेखील कर्जवाटप केलेले नाही.

कर्जवाटपासाठी बॅंकांकडे पैसाच नाही, तर कर्जवाटप कुठून करायचे, असा प्रश्‍न बॅंक अधिकारी शेतकऱ्यांना करीत आहेत. त्यामुळे बळिराजा स्वत:ची जमीन गहाण ठेवून खासगी सावकारांकडून ज्यादा व्याजदाराने कर्ज घेऊ लागल्याने राज्यातील सावकारांची संख्या वाढल्याचे समोर आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com