सोलापूर : राज्यात दरवर्षी सरासरी तीन हजार शेतकरी आत्महत्या होतात. मागील वर्षी जानेवारी ते नोव्हेंबरपर्यंत दोन हजार 532 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या तर यंदा त्याचे प्रमाण घटले आहे. जानेवारी ते नोव्हेंबर 2020 या काळात राज्यात दोन हजार 270 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. यंदा कोकणात एकही आत्महत्या झाली नसून नागपूर व नाशिक विभाग वगळता अन्य सर्वच विभागांमध्ये शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण कमी झाल्याची माहिती मदत व पुनर्वसन विभागाने दिली आहे.
आत्महत्या घटण्याची प्रमुख कारणे...
नैसर्गिक आपत्ती काळात सरकारकडून मिळणारा दिलासा, अल्पावधीत मिळणारी भरपाई, बॅंकांच्या कर्जासाठी कमी झालेले हेलपाटे, खासगी सावकारांवर गृह विभगाचा वॉच, शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी, उत्पन्नवाढीसाठी शेतकऱ्यांना दिले जाणारे तांत्रिक प्रशिक्षण आणि सरकारकडून मिळालेली नुकसान भरपाई बॅंकांनी कर्जात वर्ग न करता थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचे सरकारने दिलेले आदेश, या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी झाल्याचे निरीक्षण मदत व पुनर्वसन विभागाने नोंदविले आहे. तसेच आरोग्य, पशुसंवर्धन, शिक्षण, महिला व बालकल्याण, कृषी आणि मदत व पुनर्वसन विभागाच्या योजनांचा लाभ आता थेट शेतकऱ्यांच्या दारापर्यंत पोहचला आहे. तर राज्यातील नव्या सरकारकडून वाढलेल्या अपेक्षा आणि कर्जमाफीचा झालेला लाभही त्यासाठी कारणीभूत ठरला आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, धुळे, जळगाव, औरंगाबाद, जालना, परभणी, नांदेड, लातूर, अकोला, बुलडाणा, वर्धा, गडचिरोली या जिल्ह्यातील आत्महत्यांचे प्रमाण कमी झाले आहे.
विभागनिहाय शेतकरी आत्महत्या (जानेवारी ते नोव्हेंबर)
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.