शेतकरी पीक योजना कोणाच्या भल्यासाठी? : पी. साईनाथ

P-Sainath
P-Sainath

नांदेड : नापिकीमुळे त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याऐवजी पीक विम्याच्या नावाखाली शासन शेतकऱ्यांची फसवणूक करीत आहे. ही योजना शेतकऱ्यांच्या भल्यासाठी आहे की कॉर्पोरेट कंपन्यांच्या भल्यासाठी आहे, असा संशय उपस्थित होत असल्याची टीका रॅमन मॅगसेसे पुरस्कार विजेते पत्रकार पी. साईनाथ यांनी आज (शनिवार) केली. 

मराठी पत्रकार परिषदेच्या दोन दिवसांच्या 42 व्या राष्ट्रीय अधिवेशनाच्या उद्‌घाटनप्रसंगी ते येथे बोलत होते. आपत्तीच्या काळात पिकांना विम्याचे संरक्षण मिळावे आणि शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य लाभावे म्हणून 13 जानेवारी 2016 रोजी सरकारने 'पंतप्रधान पीक विमा योजना' सुरू केली. मात्र, ही योजना फसवी आहे. यात शेतकऱ्यांचे हित काहीच नाही. शासन सांगेल त्याच कंपनीचा विमा शेतकऱ्यांना घ्यावा लागत आहे. त्यासाठी कंपनीची निवड करण्याचेही स्वातंत्र्य शेतकऱ्यांना नाही.

विशेष म्हणजे या कंपन्यांची कार्यालये त्या-त्या जिल्ह्यात नाहीत. शेतकऱ्यांच्या काही तक्रारी असतील तर त्यांनी कुणाकडे द्यायच्या, असा मोठा गहन प्रश्‍न असल्याचेही साईनाथ यांनी सांगितले. काही दिवसांपूर्वीच परभणी येथील शेतकऱ्यांना एका खासगी विमा कंपनीला पळवून लावल्याचे उदाहरण देऊन शेतकऱ्यांपेक्षा विमा कंपन्यांचे हित जोपासणारी ही योजना आहे, हे स्पष्ट होत असल्याचेही त्यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com