विधान परिषदेच्या पाच जागांसाठी तीन फेब्रुवारीला मतदान

vidhan-parishad
vidhan-parishad

मुंबई - महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या पाच जागांसाठी तीन फेब्रुवारीला मतदान होणार आहे. औरंगाबाद, नागपूर आणि कोकण विभागातील शिक्षक मतदारसंघांच्या आणि अमरावती व नाशिक विभागातील पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुकीसाठी हे मतदान होईल. 

या पाचही जागांवरील उमेदवारांचा कार्यकाल पाच डिसेंबरला संपला आहे. निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास दहा जानेवारीला सुरूवात होईल. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत 17 जानेवारी आहे. 18 जानेवारीला अर्जांची छाननी होईल. 20 जानेवारीपर्यंत उमेदवारांना अर्ज माघारीची मुदत आहे. तीन फेब्रुवारीला सकाळी आठ ते दुपारी चार या वेळेत मतदान होईल. सहा फेब्रुवारीला मतमोजणी होईल, असे केंद्रीय निवडणूक आयोगाने आज (बुधवार) जाहीर केले. निवडणूक होत असलेल्या सर्व जिल्ह्यांमध्ये आजच आचारसंहिता लागू झाली आहे. 

निवडणूक होत असलेले मतदारसंघ आणि तेथील मुदत संपलेले सदस्य असेः
औरंगाबाद शिक्षक मतदारसंघः विक्रम काळे
नागपूर शिक्षक मतदारसंघः नागो गाणार
कोकण शिक्षक मतदारसंघः रामनाथ मोते
अमरावती पदवीधर मतदारसंघः रणजीत पाटील
नाशिक पदवीधर मतदारसंघः सुधीर तांबे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com