दुष्काळग्रस्तांना हेक्‍टरी 50 हजार द्या - अजित पवार 

दुष्काळग्रस्तांना हेक्‍टरी 50 हजार द्या - अजित पवार 

मुंबई  - राज्यात 1972 पेक्षाही भयानक दुष्काळाची स्थिती असून, सरकार आंधळेपणाने वागत आहे. केंद्रीय पथकाची वाट बघत वेळकाढूपणा करण्यापेक्षा दुष्काळ जाहीर करा. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना हेक्‍टरी 50 हजार रुपये मदत द्या, अशी मागणी करत भारनियमनमुक्‍त महाराष्ट्राच्या भूलथापा न मारता अगोदर भारनियमन रद्द करा, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी पत्रकार परिषदेमध्ये केली. 

निम्मा महाराष्ट्र दुष्काळाने होरपळत असताना केंद्राचे पथक येण्याची वाट पाहिली जात आहे. परंतु या सरकारची इच्छाशक्ती असती तर विमानानेही पथकाला आणता आले असते, मग हे सरकार कुणाची वाट बघते आहे? असा सवाल करत किती शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यावर केंद्राचे पथक येणार आहे, असा संतप्त सवाल अजित पवार यांनी सरकारला केला. 

या वेळी बोलताना अजित पवार म्हणाले की, साईबाबांच्या शिर्डीमध्ये पंतप्रधान मोदी यांनी 16 हजार गावे दुष्काळमुक्त झाल्याचे सांगितले. मग ती 16 हजार गावे कुठे आहेत. 201 तालुके आणि 20 हजार गावे आणि 13 जिल्ह्यांत तीव्र पाणीटंचाई असताना पंतप्रधान अशा प्रकारे खोटी आकडेवारी देत असतील तर जनतेने विश्‍वास तरी कोणावर ठेवावा? असा सवाल करत हा आकड्यांचा खेळ सरकारने थांबवावा, असा टोला त्यांनी लगावला. 

सरकारकडे फक्त 275 दिवस राहिले आहेत. दुष्काळी भागातील लोकांच्या रोजगाराचा प्रश्न सोडविण्यासाठी सरकारने पावले उचलावीत. दुष्काळी भागातील लोकांना रोहयोमधून काम द्यावे आणि ग्रामीण भागात सरकार देत असलेली मजुरी 203 रुपयांऐवजी ती वाढत्या महागाईचा विचार करता 350 रुपये इतकी करावी आणि दुष्काळ संपेपर्यंत ती ठेवावी, अशी मागणीही अजित पवार यांनी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com