अपघातानंतरही मिळेना बळिराजाला आधार

gopinath munde accident insurance scheme
gopinath munde accident insurance scheme

प्रस्ताव ३ हजार अन्‌ ५७१ कुटुंबांनाच लाभ
सोलापूर - राज्यातील शेतकऱ्यांचे २०१५-१६ पासून गोपिनाथ मुंडे अपघाती विमा योजनेतील सुमारे साडेचार हजार, तर २०१७-१८ मधील दोन हजार ८३१ प्रस्तावांपैकी एक हजार १६५ प्रस्ताव प्रलंबित आहेत. कागदपत्रांची पूर्तता करूनही दुर्घटनाग्रस्त शेतकरी कुटुंबांना या योजनेंतर्गत लाभासाठी आठ-दहा महिन्यांची प्रतीक्षा करावी लागत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

राज्य सरकारने या अपघात विमा योजनेसाठी नियुक्‍त केलेल्या ओरिएन्टल इन्शुरन्स कंपनीकडून प्रस्ताव मंजूर करून घेणे व प्रस्तावांमधील त्रुटींची पूर्तता करण्याच्या उद्देशाने जानेवारी २०१८ मध्ये नागपूरच्या जयका इन्शुरन्स ब्रोकरेज कंपनीची सल्लागार म्हणून नियुक्‍ती केली. त्यासाठी या कंपनीला सात लाख रुपयांची फी देण्यात आली. प्राप्त प्रस्तावावर ६० दिवसांत कार्यवाही होणे आवश्‍यक असतानाही प्रस्ताव दाखल झाल्यानंतर संबंधितांना चार-पाच महिन्यांनंतर त्रुटी सांगण्यात येतात. वारंवारच्या त्रुटी आणि अवास्तव कागदपत्रांची मागणी यासह अन्य कारणांमुळे बहुतांशी शेतकरी कुटुंबांनी या योजनेकडे पाठ फिरविल्याचे चित्र आहे. मागच्या वर्षी राज्यातून दोन हजार ८२९ प्रस्ताव विमा कंपनीकडे दाखल झाले. त्यामध्ये आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांचा सर्वाधिक समावेश असूनही आतापर्यंत केवळ ५७१ जणांनाच लाभ मिळाला आहे.

गोपिनाथ मुंडे अपघात विमा योजनेंतर्गत विमा कंपनीकडे प्रस्ताव पाठविले जातात. परंतु, मंजुरीच्या तुलनेत प्रलंबित आणि त्रुटी असलेल्या अर्जांचे प्रमाण वाढत आहे. त्यासाठी विमा कंपनीकडे सातत्याने पाठपुरावा केला जातोय. 
- रवींद्र माने, उपसंचालक, कृषी विभाग, सोलापूर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com