दुष्काळी मदतीत शासनाचा अखडता हात 

दुष्काळी मदतीत शासनाचा अखडता हात 

पाळधी (ता. जामनेर) : खरीप हंगामात परतीच्या पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे शेतकरी कर्जबाजारी झालेला आहे. जामनेर तालुक्यात ६५ हजार ८४३ शेतकरी दुष्काळी मदतीस पात्र ठरले. त्याकरिता ८३.४१ कोटी रुपयांची आवश्यकता असताना मात्र मदतीचा पहिला टप्पा २३. ४१ कोटी रुपये जामनेर तालुक्यासाठी प्राप्त झाले आहेत. त्यामुळे शेतकरी अद्यापही मदतीपासून वंचित आहेत. 

शेतमालाची नासाडी झाल्याने उधारी आणि उसनवारी चुकविण्यासाठी शेतकऱ्याजवळ पैसे नाहीत. त्यामुळे शेतकऱ्याची आर्थिक बिकट परिस्थिती निर्माण झालेली आहे. पै-पै जुळवून परिवाराचा काटकसरीने उदरनिर्वाह करावा लागत आहे. जामनेर तालुक्यात परतीच्या पावसाने मोठा प्रमाणात थैमान घातल्याने खरीप हंगामातील पिकाची मोठ्या प्रमाणात नासाडी झाली. तालुक्यात ओल्या दुष्काळाचे स्वरूप पाहता शासनाकडून तत्काळ बांधावर जावून पंचनामे करण्यात आले. महसूल आणि कृषी विभाग यांच्या संयुक्त अहवालानुसार १ लाख ५ हजार हेक्टर नुकसान झाल्याचा अहवाल जिल्हा स्तरावर पाठविण्यात आला. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू असताना राज्यपालांनी तत्काळ दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी ८ हजाराची मदत जाहीर केली तर फळबाग धारकांना हेक्टरी १८ हजार रुपये दोन हेक्टर पर्यतच्या मुदतीत जाहीर करण्यात आली. तालुक्यात ६५ हजार ८४३ शेतकरी दुष्काळी मदतीस पात्र ठरले. त्याकरिता ८३.४१ कोटी रुपयांची आवश्यकता असताना मात्र मदतीचा पहिला टप्पा २३. ४१ कोटी रुपये जामनेर तालुक्यासाठी प्राप्त झाले आहेत. त्यामुळे तालुक्यातील काही छोट्या गावांना हेक्टरी ८ हजार रुपये प्रमाणे मदत निधी वितरित करण्यात आल्याची माहिती तहसीलदार अरुण शेवाळे यांनी दिली. परंतु पाळधी, सोनाळा, नाचनखेडा, भराडीसह तालुक्यातील उर्वरित गावातील शेतकरी अद्यापही दुष्काळी मदतीपासून वंचित आहेत. शासनाने तत्काळ शेतकऱ्याच्या खात्यात मदत जमा करावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत. 


एक हेक्टर क्षेत्रात कपाशी पिकाची लागवड केली होती. कापूस वेचणीवर असताना सलग दहा दिवस झालेल्या अवकाळी पावसाने कापसाला कोंब फुटले. कापुस हातचा गेला. खर्चाएवढे ही उत्पादन मिळाले नाही. शासनाकडूनही तोडकी मदत जाहीर झाली ते ही अद्याप खात्यात रक्कम जमा झालेली नाही. 
- दिनेश परदेशी, शेतकरी पाळधी, (ता. जामनेर) 

जामनेर तालुक्यातील एक लाख पाच हजार क्षेत्र दुष्काळग्रस्त घोषित केले असून ६५८४३ शेतकऱ्यांना याचा लाभ होईल शासनाकडे ८३.४१ कोटी रुपयांची मागणी केली आहे त्यापैकी २३.४१ कोटी रुपये प्राप्त झाले असून छोट्या गावापासून वाटप करण्यास सुरुवात केली आहे लवकरच सर्व गावांना निधीचे वाटप करण्यात येईल. 
 अरुण शेवाळे- तहसीलदार जामनेर. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com