नवा ट्विस्ट : राष्ट्रवादीला सत्तास्थापनेचे निमंत्रण; नेते राज्यभवनाकडे रवाना

New Twist in maharashtra Politics
New Twist in maharashtra Politics

मुंबई : महाराष्ट्रातील सत्तास्थापनेचा गुंता सुटत नाही. शिवसेना राज्यपालांनी दिलेल्या मुदतीत सरकार स्थापन न करु शकल्याने राज्यपालांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तास्थापनेचे निमंत्रण दिले आहे. पुढच्या 24 तासांत पुरेसं संख्याबळ दाखवून सत्तास्थापन करण्याची इच्छा व्यक्त करणं आवश्यक असल्याचे राज्यपालांनी सांगितले आहे.

शिवसेनेनं तीन दिवसांची मुदत मागितली होती. पण, ती राज्यपालांनी दिली नाही. काँग्रेस पक्षाने आणि राष्ट्रवादी काँग्रेसने महाराष्ट्रात सत्ता स्थापनेसाठी पाठिंबा दिल्याचा दावा करत शिवसैनिकांकडून राज्यभरात जल्लोष साजरा केला जात असतानाच काँग्रेसने मात्र अजून अधिकृत पाठिंबा दिला नाही. काँग्रेसची ही भूमिका शिवसेनेला आणि सर्वांनाच बुचकळ्यात टाकणारी ठरली. त्यानंतर मात्र, राज्यपालांनी थेट तिसरा मोठा पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सत्ता स्थापनेसाठी आमंत्रित केले.

राष्ट्रवादी काँग्रेसला सत्ता स्थापनेसाठी राजभवनाच्या दिशेने रवाना झाले आहेत. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तास्थापनेचं निमंत्रण दिल्याचं समजतं आहे. परंतु, राष्ट्रवादीचे गटनेते अजित पवार यांनी मात्र, राज्यपालांनी केवळ भेट घेण्यासाठी बोलावले असून त्यांनी कुठल्याही प्रकारचे सत्ता स्थापनेसाठी निमंत्रण दिले नाही. त्यांची भेट घेतल्यानंतरच काय ते स्पष्ट होईल असे अजित पवार यांनी सांगितले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com