राज्यभरात बारावीत मुलींचीच बाजी

12th
12th

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च 2019 मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (बारावी) परीक्षेचा निकाल आज मंगळवारी(ता.28) जाहीर करण्यात आला. यंदा राज्याचा निकाल 85.88 टक्के लागला आहे.

पुण्याचा बारावीचा निकाल 87.88 टक्के लागला असून पुण्यातील 575 विद्यार्थ्यांना 90 टक्क्यापेक्षा अधिक गुण मिळाले आहेत.

औरंगाबाद विभागाचा निकाल 87.29 एव्हढा लागला आहे. यावर्षी बारावीचा निकाल 1.45 टक्‍क्‍यांनी घसरला आहे. मागील दहा वर्षातील सर्वात कमी टक्‍क्‍यांची नोंद यावर्षी करण्यात आली आहे. विज्ञान शाखेचा 94.44 टक्के, वाणिज्य शाखेचा 90.60 टक्के, कला शाखेचा 87.83 टक्के, तर एचएससी व्होकेशनल 87.62 टक्के निकाल लागला आहे. 

हिंगोली जिल्ह्याचा इयत्ता बारावीचा निकाल ८०.७७ टक्के लागला असून ६१७ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले आहे. वाणिज्य शाखेचा निकाल सर्वात जास्त ९०.४८ टक्के लागला आहे. विज्ञान शाखेचा निकाल ८९.९० टक्के, कला शाखेचा निकाल ७३.७५ टक्के वाणिज्य शाखेचा निकाल 90.48 टक्के लागला आहे.  

अमरावती माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेत वाशीम जिल्ह्याने टॉप करत अमरावती विभागातील इतर जिल्ह्यांना पिछाडीवर टाकले. या जिल्ह्याच्या निकालाची टक्केवारी ९१.५५ इतकी आहे. तर अमरावती विभागाने यंदा उल्लेखनीय कामगिरी करीत टॉप थ्रीमध्ये येण्याचा बहूमान पटकावला. विभागाचा यंदाचा निकाल ८७.५५ टक्के लागला, अशी माहिती अमरावती बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली. विभागात विज्ञान शाखेचा सर्वाधिक ९४.८९ टक्के, वाणिज्य शाखेचा ९३.१३ टक्के, तर कला शाखेचा ८१.८९ टक्के लागला आहे.

परभणी जिल्ह्याचा निकाल 84.51 टक्के लागला आहे. जिल्ह्यात सर्वाधिक विज्ञान शाखेचा निकाल असून 91.72 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. कला शाखेचा निकाल 76.74 टक्के, वाणिज्य शाखेचा निकाल 90.97 टक्के तर व्होकेशनल विषयाचा निकाल 73.64 टक्के लागला.

अकोला जिल्ह्याचा निकाल ८७.४२ टक्के लागला असून, मुलींच्या उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ९१.४६ टक्के आहे. 

सोलापूर जिल्ह्यातील 52 हजार 814 विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली. त्यापैकी 46 हजार 579 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून एकूण निकाल 88.19 टक्‍के इतका लागला आहे. मागच्या वर्षी जिल्ह्याचा निकाल 90.37 टक्‍के लागला होता. यंदा मात्र, त्यात 2.18 टक्‍क्‍यांची घसरण झाली आहे. दरम्यान, यंदाही मुलींनीच परीक्षेत मुलींनीच बाजी मारली आहे.

इयत्ता बारावीच्या परिक्षेत बारामती केंद्राचा निकाल 90.85 टक्के जाहिर झाला. यंदा या परिक्षेसाठी बारामती केंद्रातून 7410 विद्यार्थी या परिक्षेसाठी बसले होते त्या पैकी 6732 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. 
यंदा बारावीच्या परिक्षेला बारामतीतून 3841 मुले तर 3569 मुली बसल्या होत्या. त्या पैकी 3308 मुले तर 3424 मुली उत्तीर्ण झाल्या. यंदाही मुलींच्या यशाचा टक्का मुलांहून अधिक आहे. मुलांच्या उत्तीर्ण होण्याचे प्रमाण यंदा 86.12 टक्के आहे तर मुलींचे हेच प्रमाण 95.94 टक्के इतके आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com