आइस्क्रीमचा उद्योग यंदा ‘गरम’!

देशातील उलाढालीत वाढणार, कोरोनाची मरगळ दूर होणार
IceCream
IceCreamsakal

औरंगाबाद : कोरोनामुळे दोन वर्षांत आइस्क्रीम उद्योगाचे सुमारे चौदाशे कोटी रुपयांचे नुकसान झाले होते. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने यंदा हा उद्योग तेजीत आला असून त्यातील उलाढालही वाढली आहे. त्यामुळे देशात या हंगामात सुमारे ३० हजार कोटींची उलाढाल होण्याची शक्यता आहे. त्यातून कोरोना काळात झालेले नुकसान भरून काढण्याची नामी संधी उद्योजकांना मिळेल.

देशभरात फेब्रुवारी ते जून दरम्यान आइस्क्रीम व्यवसाय तेजीत असतो. कोरोना लॉकडाउन काळात हा व्यवसाय पूर्णपणे थंड होता. यंदा तो जानेवारीपासूनच तेजीत आहे. दरवर्षी देशात आइस्क्रीममधून २० हजार कोटींची उलाढाल होते. यंदा ती ३० हजार कोटींपर्यंत होण्याची शक्यता उद्योजकांनी वर्तविली आहे. देशात सर्वाधिक आइस्क्रीम विक्री गुजरातमध्ये होते. त्यापाठोपाठ महाराष्ट्र, दिल्ली, कर्नाटक आणि राजस्थानचा क्रमांक लागतो. महाराष्ट्रात दरवर्षी दोन हजार कोटींची उलाढाल होते. यंदा ती तीन हजार कोटींपर्यंत जाण्याची शक्यता आहे.

उद्योजक, शेतकऱ्यांना फायदा

दूध उत्पादनात भारताचा पहिला क्रमांक आहे. देशाच्या एकूण ‘जीडीपी’च्या पाच टक्के हिस्सा डेअरी उद्योगाचा आहे. आइस्क्रीमसाठी लागणारे दूध, क्रीम, बटर, दूध पावडर, खवा आदी कच्चा माल डेअरी उद्योगापासूनच मिळतो. त्यामुळे उद्योजकांसह शेतकऱ्यांचाही फायदा होतो. कोरोना काळात आइस्क्रीमसाठी लागणारी मिल्क पावडर आयात करण्यासाठी सरकारने परवानगी दिली नव्हती. यंदा ती देण्यात आल्याने सरकारने मोठ्या प्रमाणात मिल्क पावडर आयात केली. त्यामुळे आइस्क्रीम उद्योगाला लागणारा कच्चा माल मुबलक प्रमाणात उपलब्ध झाला आहे.

कच्चा मालाच्या किमतीत वाढ

आइस्क्रीमसाठी लागणाऱ्या दूध, दूध पावडर, चॉकलेट, बटर आदींच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. वीज, इंधनाचे दरही वाढले आहेत. वाहतूक खर्चात वाढ झाली आहे. ग्रामीण भागातील आइस्क्रीम उद्योगांसमोर भारनियमनाचे आव्हान आहे. त्यामुळे या उद्योगातून एकंदरीत उलाढाल वाढली असली तरी, महागाईमुळे नफ्याची टक्केवारी घसरली आहे. आइस्क्रीम उद्योगात नेस्ले, हॅवमोअर, क्वालिटी वॉल्स, लोटे या विदेशी तर अमूल, मदर डेअरी, वाडिलाल, दिनशॉ, क्रिम एन जॉय आदी भारतीय कंपन्या आहेत.

आइस्क्रीमच्या मागणीत यंदा मोठी वाढ झाल्याने कोरोना काळात नुकसान सहन करूनही तग धरून राहिलेल्या कंपन्यांना मोठा फायदा झाला आहे. दूध उत्पादक, शेतकरी, व्यापाऱ्यांनाही चांगली संधी आहे. स्पर्धेमुळे आइस्क्रीमच्या किमतीत बदल झालेला नाही. उन्हाळ्यासह लग्नसराई, हॉटेल व्यवसाय, सण-उत्सवांत आइस्क्रीमला पसंती मिळत आहे.

- अनिल एस पाटोदी, अध्यक्ष, आइस्क्रीम मॅन्युफॅक्चर असोसिएशन, तथा मुख्य संरक्षक, स्मॉल केअर आइस्क्रीम मॅन्युफॅक्चर असोसिएशन.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com