सुलभ अर्थनीतीचा आग्रह धरणार - शरद पवार

Sharad-Pawar
Sharad-Pawar

बारामती शहर - ‘मंदीच्या संकटावर मात करण्यासाठी संघटितरीत्या पावले टाकण्याची गरज आहे. सुलभ अर्थनीती तयार करण्याबाबत सरकारला आग्रह धरणे, हा मंदीवरचा उपाय आहे. सरकारने निर्णय घेतला नाही, तर यासंदर्भात संसदीय पातळीवर आम्ही सर्व विरोधक एकत्र येत दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करणार आहोत,’’ अशी माहिती ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी दिली.

दिवाळी पाडव्यानिमित्त मर्चंट्‌स असोसिएशनच्या वतीने आयोजित व्यापारी मेळाव्यात शरद पवार बोलत होते. ते म्हणाले, ‘‘प्रतिकूल धोरणे आखूनही व्यापारी विरोधात भाष्य करण्याची भूमिका घेत नाहीत. त्यामुळे राज्यकर्त्यांनाही काही निर्णय घ्यावेसे वाटत नाहीत. मंदीचे संकट सर्वांनाच जाणवत आहे. मात्र, त्यावर कोणी बोलायला तयार नाही, ही बाब खेदजनक आहे.’’

‘जोपर्यंत सामान्यांची क्रयशक्ती वाढत नाही, गुंतवणुकीला पोषक वातावरण तयार होत नाही, तोपर्यंत मंदीच्या संकटावर मात करता येणार नाही. शेतकरी व सामान्य माणसाची क्रयशक्ती वाढविण्यासाठी सरकारने गुंतवणुकीच्या क्षेत्रात उतरले पाहिजे,’’ अशी अपेक्षा पवार यांनी व्यक्त केली. या वेळी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, ‘सकाळ’चे अध्यक्ष प्रतापराव पवार, खासदार सुप्रिया सुळे, रोहित पवार, पौर्णिमा तावरे आदी उपस्थित होते. मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष महावीर वडूजकर यांनी प्रास्ताविक केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com