विषारी सुपारी रोखण्यासाठी कडक बंदोबस्त ठेवा! 

विषारी सुपारी रोखण्यासाठी कडक बंदोबस्त ठेवा! 

मुंबई - आरोग्यास अत्यंत घातक असलेली विषारी सुपारी थायलंड किंवा अन्य कोणत्याही देशांमधून आपल्या देशामध्ये समुद्र किंवा अन्य कोणत्याही मार्गाने येऊ नये यासाठी पुरेसा काटेकोर बंदोबस्त तैनात करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारसह सीमाशुल्क आणि अन्य प्रशासकीय यंत्रणांना दिले आहेत. 

सीमाशुल्क विभागाने नागपूरमध्ये समुद्रमार्गाने आलेली हजारो टन सुपारी जप्त केली आहे. ही सुपारी आरोग्यास अपायकारक आहे. त्यामध्ये किडे आणि छिद्रे आहेत. तसेच या सुपारीमुळे कर्करोग होण्याची शक्‍यताही वर्तवण्यात आली आहे. याबाबत उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठापुढे जनहित याचिका करण्यात आली आहे. या याचिकेवर न्या. बी. पी. धर्माधिकारी आणि न्या. एम. जी. गिरटकर यांच्या खंडपीठापुढे नुकतीच सुनावणी झाली. 

राज्य सरकार, सीमाशुल्क विभाग, केंद्र सरकार आदी सर्व यंत्रणांनी देशात कोणत्याही प्रकारे विषारी सुपारी येऊ नये यासाठी चोख बंदोबस्त तैनात करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. तसेच सीबीआयला प्रतिवादी करण्याचे निर्देशही न्यायालयाने याचिकादाराला दिले आहेत. सीबीआयला नोटीस बजावून तपासाची कागदपत्रे त्यांच्याकडे सुपूर्द करण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत. 

तपासातून ठोस माहिती नाही! 
सीमाशुल्क विभागाने जप्त केलेला संबंधित माल इंडोनेशिया, म्यानमार आणि मिझोरम या ठिकाणांहून आला आहे; मात्र हा माल कोणी पाठवला याचा शोध तपासयंत्रणा घेत आहेत. सध्या सुमारे एक लाख टनांहून अधिक सुपारी सीमाशुल्क विभागाने जप्त केली आहे. या प्रकरणात अद्याप कोणालाही अटक झालेली नाही. चौकशीतूनही ठोस माहिती उघड झालेली नाही. त्यामुळे खंडपीठाने या सर्व प्रकाराबाबत चिंता व्यक्त केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com