मुंबई : राज्याच्या विविध भागांतून आलेल्या आदिवासी-शेतकऱ्यांसोबत सुरु असलेली बैठक आज (गुरुवार) एक तासानंतर संपली. या मोर्चेकऱ्यांच्या मागण्या लिखित स्वरुपात मान्य करण्यात आल्या आहेत. त्यामुळे आंदोलन मागे घेण्याची घोषणा लवकरच केली जाण्याची शक्यता आहे. तसेच तीन महिन्यांच्या आतमध्ये याबाबतचे प्रश्न सोडवण्यासाठी राज्य सरकारकडून आश्वासन देण्यात आले आहे.
या मोर्चासाठी मराठवाडा, विदर्भ, सांगली- सातारा, नाशिक- जळगाव, ठाणे आणि पालघर यांसारख्या भागांतून हजारोंच्या संख्येने आदिवासी-शेतकरी आले. तसेच त्यांच्यासोबत लहान मुलांसह आबालवृद्धही सहभागी झाल्याने त्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या मोर्चेकऱ्यांनी मुंबईतील आझाद मैदानात ठाण मांडले. याची गंभीर दखल सरकारने घेतली असून, या मोर्चेकऱ्यांसोबत तासभर चर्चा केली.
दरम्यान, विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान शेतकऱ्यांचा हा मोर्चा आल्याने सरकारच्या मोठ्या अडचणींना सामोरे जाण्याची शक्यता आहे. मात्र, सरकारकडून या मोर्चेकऱ्यांना तीन महिन्यांत मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन देण्यात आल्याने तूर्त हे आंदोलन मागे घेण्यात येईल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.