कर्जमाफी हा मोठा गैरव्यवहार - उद्धव ठाकरे

कर्जमाफी हा मोठा गैरव्यवहार - उद्धव ठाकरे

नगर - ‘‘किती शेतकऱ्यांचे कर्ज माफ झाले. रामदास भाई मंत्रिमंडळाच्या बैठकीत विषय घ्या. सरकारला विचारा कर्जमाफीसाठी किती आर्थिक तजवीज केली होती? किती शेतकऱ्यांचे कर्ज माफ झाले? हा कर्जमाफीचा गैरव्यवहार आहे,’’ असा आरोप करून शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरकारच्या धोरणांवर कठोर टीका केली. 

शिवसेनेचा महामेळावा आणि विविध योजनांच्या उद्‌घाटनप्रसंगी ते बोलत होते. या वेळी शिवसेनेचे विविध नेते या वेळी उपस्थित होते.

‘‘मी सत्य बोलतो; मात्र विरोधकांची भूमिका गुळगुळीत आहे,’’ अशी टीका करून ते म्हणाले, ‘‘मी सरकारच्या विरोधात खडसून बोलतो. सरकार चुकीचे काम करीत असेल, तर मी बोलेनच. मी जनतेची बाजू घेतो. सरकारला जर ती विरोधकांची वाटत असेल, तर आहे मी सरकारचा विरोधक.’’

रावसाहेब पटवर्धन यांच्यासारखी विचारवंत माणसे नगरची होती. ती नगरची ओळख होती. आता विखे, कर्डिले, छिंदम ही नगरची ओळख झाली,’’ असा टोला मारून ठाकरे म्हणाले, ‘‘पंतप्रधानांच्या सभेला गर्दी गोळा करावी लागली. मुख्यमंत्र्यांच्या सभेला गर्दी नसेल तर, सत्ता कशाला पाहिजे?’’

‘‘देशात सध्या विचित्र अवस्था आहे. महिला, मुली, तरुणी सुरक्षित नाहीत. महिलांच्या असुरक्षितेत देशाचा जगात पहिला क्रमांक लागतो. त्यामुळे विष्णूच्या अवताराच्या कारभाराचे दशावतार झाले आहेत,’’ अशी बोचरी टीका त्यांनी केली. 

कोण मोक्का लावतो, पाहतो मी
शिवसैनिकांची हत्या होते. त्यातील आरोपी जामिनावर बाहेर येतात आणि भाग्यश्री मोकाटे यांना मोक्का लागतो. आमची ताई काय दशहतवादी आहे काय? तुम्ही कसा मोक्का लावता, ते मी पाहतोच, असाही इशारा त्यांनी दिला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com