Ajit Pawar : लोकसभा-विधानसभा निवडणुका एकत्रचं - अजित पवार

विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे भाकित
Joint Lok Sabha-Assembly Elections Ajit Pawar over bjp strategy politics akola violence
Joint Lok Sabha-Assembly Elections Ajit Pawar over bjp strategy politics akola violence sakal

मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकांसोबतच राज्यातील विधानसभांच्या निवडणुका देखील एकत्रित घेण्याची भाजपची रणनीती असल्याचे भाकीत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज व्यक्त केले.

या एकत्रित निवडणुकांना सामोरे जाण्याच्या दृष्टीनेच महाविकास आघाडीचे ४८ लोकसभा आणि २८८ विधानसभांच्या जागावाटपाचे सूत्र ठरवण्यासाठी तयारी सुरू झाली असून, तिन्ही पक्षांतील सहा नेते यावर लवकरच बैठकांचे सत्र सुरू करतील, अशी माहितीही अजित पवार यांनी दिली. विधानभवनात ते बोलत होते.

दरम्यान, महाविकास आघाडीतील सर्वच घटक पक्षांनी लोकसभेच्या ४८ व विधानसभेच्या २८८ जागांचे वाटप करून कोणत्या जागा कुणी लढवाव्यात यावर प्राथमिक चर्चा आघाडीच्या बैठकीत झाल्याचेही माहितीही पवार यांनी दिली. लोकसभेसोबतच विधानसभेच्या निवडणुका होण्याचे संकेत असल्याने एकदा निवडणुका लागल्यावर धावपळ व्हायला नको म्हणूनच मविआने तयारी सुरू करण्याबाबतची चर्चा बैठकीत झाल्याचे अजित पवार म्हणाले.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात यांच्याशी संपर्क साधला. त्यानुसार रविवारी (ता.१४) महाविकास आघाडीची बैठक झाली. या बैठकीतील चर्चेची माहिती जयंत पाटील, संजय राऊत, नाना पटोले यांनी माध्यमांना दिलीच आहे, असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.

अजित पवार पुढे म्हणाले की, २०१४ पासून ते सध्याच्या पार पडलेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निकालापर्यंत काही राज्यांचा अपवाद वगळता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात दोनवेळा आणि वेगवेगळ्या राज्यांत सरकारे आली.

त्यामुळे भाजपमध्ये उत्साह पाहायला मिळायचा. मात्र यामुळे विरोधक नाऊमेद झाले होते. पण कर्नाटक विधानसभेच्या निकालात काँग्रेसने १३५ पर्यंत मजल मारली त्यामुळे विरोधकांचा उत्साह द्विगुणित झाला. यावेळी महाविकास आघाडी करून निवडणुका लढवण्याचा निर्णय झाला आहे, असेही अजित पवार यांनी सांगितले.

मविआच्या गोटात...

मविआच्या जागावाटपाची तयारी

सहा जणांची समिती ठरवणार सूत्र

अकस्मात धावपळ नको म्हणून एकत्रच निर्णय

अकोला दंगलीची चौकशी करा

अकोला येथील समाजकंटकांच्या दोन गटातील वाद ही गंभीर बाब असून, राज्य सरकारने या गोष्टींना आवर घातला पाहिजे, असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले. या प्रकरणा अगोदर कोणी वादग्रस्त चित्रफीत समाजमाध्यमांत पसरविल्या याची शहानिशा केली पाहिजे.

अलीकडे सायबर गुन्हे वाढले आहेत. ही क्लीप कुणी व्हायरल केली, यामागे मास्टरमाईंड कोण होता, त्याचा उद्देश काय होता, या सर्व खोलात तातडीने गेले पाहिजे. हे एका ठिकाणी झाले उद्या ते दुसरीकडे होऊ शकते. राज्यात कायदा व सुव्यवस्था राखण्याचे काम राज्य सरकारच्या हातात असणाऱ्या पोलिस यंत्रणेकडे असते. पोलिस यंत्रणेत राजकीय हस्तक्षेप न होता अशा प्रकारच्या चौकशा पूर्ण करण्यासाठी मुभा दिली तर पोलिस यंत्रणा चांगल्या प्रकारे काम करू शकते, असा अनुभव आहे असेही अजित पवार म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com