विधानसभा 2019 :
मुंबई : मुंबईकरांनी विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी निरुत्साह दाखवल्याने मतदानाच्या टक्केवारीत मोठी घट झाली आहे. त्यामुळे राज्यात सर्वांत कमी मतदानाची नोंद मुंबईतील कुलाबा मतदारसंघात झाली आहे.
कुलाबा मतदारसंघात उच्चभ्रू लोकांचे प्रमाण अधिक आहे. मात्र या मतदारसंघात केवळ ४०.२० टक्के मतदानाची नोंद झाली आहे. सर्वाधिक कमी मतदार करणाऱ्या मतदारसंघात कुलाबा पहिल्या क्रमांकवार आहे. तर दुसऱ्या स्थानावर उल्हासनगर आणि तिसऱ्या स्थानवर कल्याण पश्चिम या मतदारसंघाचा समावेश आहे. या मतदारसंघात काँग्रेसचे भाई जगताप आणि भाजपचे राहुल नार्वेकर यांच्यामध्ये मुख्य लढत आहे. कमी मतदानाचा फटका नेमका कुणाला बसणार याची चर्चा आता सुरू झाली आहे. या मतदारसंघाचे विद्यमान आमदार भाजपचे राज पुरोहित होते.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.