महाराष्ट्र-आसाम संस्कृतीचे ‘हस्तांदोलन’

ek bharat shreshtha bharat
ek bharat shreshtha bharat

दोन्ही राज्यांतील तेरा विद्यापीठांद्वारे होणार परंपरांचे आदान-प्रदान
पुणे - महाराष्ट्र आणि आसाम हातात हात घालून संस्कृती आणि परंपरांची देवाणघेवाण करणार आहेत. या महिन्यातील शेवटच्या आठवड्यापासून दोन्ही राज्यांतील प्रत्येकी तेरा विद्यापीठांमध्ये हे आदान-प्रदान सुरू होणार आहे. याअंतर्गत महाराष्ट्रात आसामी भाषेचे, तर आसाममध्ये मराठीचे वर्गही सुरू होणार आहेत.

केंद्र सरकारच्या ‘एक भारत-श्रेष्ठ भारत’ या योजनेअंतर्गत महाराष्ट्राला आसामशी जोडण्यात येणार आहे. दोन्ही राज्यांतील प्रत्येकी तेरा विद्यापीठांतील विद्यार्थ्यांद्वारे या राज्यांतील संस्कृतीचा संगम पाहायला मिळणार आहे. महाराष्ट्रातील विद्यार्थी आसाममध्ये मराठी संस्कृतीचे दूत म्हणून जातील, तसेच त्या राज्यातील आसामची संस्कृती घेऊन तेथील विद्यार्थी येथे येतील. या राज्यांतील विद्यापीठांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम, बोलीभाषा, वादविवाद स्पर्धा, चर्चा या माध्यमांतून परस्परांच्या संस्कृतीला आत्मसात करतील.

केवळ सांस्कृतिक कार्यक्रमांवर हा उपक्रम थांबणार नाही, तर भाषिक संस्कृतीची देवघेव व्हावी, यादृष्टीने दोन्ही राज्ये शाळा, महाविद्यालयांमध्ये मराठी आणि आसामी भाषेचे वर्ग सुरू करणार आहेत. या राज्यांतील सुटीच्या काळात हे विद्यार्थी आसाम आणि महाराष्ट्रात जाऊन तेथील सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारशांच्या पाऊलखुणाही पाहतील. त्यासाठी विद्यापीठांतर्गत विद्यार्थ्यांचे दौरे आयोजित करण्यात येणार आहेत.

योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी महाराष्ट्रातील विद्यापीठे आणि आसाममधील विद्यापीठांमध्ये एका प्राध्यापकाची समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. कार्यक्रमांची रूपरेषा आखण्यापासून ते नियोजनाचे काम हे अधिकारी करतील. राज्यदर्शनासाठी दौरे, भाषा जोड प्रकल्प राबविणे, दीर्घकालीन सुसंवादाचे माध्यम म्हणूनही हे अधिकारी नियमितपणे काम पाहणार आहेत. दोन्ही राज्यांतील तेरा विद्यापीठांमध्ये यासंबंधी वेगळा सामंजस्य करारही केला जाणार आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला भुवनेश्‍वर येथील उत्कल विद्यापीठाशी, मुंबई विद्यापीठाला बालासोर येथील फकीर मोहन विद्यापीठाशी, कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाला वीर सुरेंद्र साई तंत्रज्ञान विद्यापीठाशी, रामटेक येथील कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाला पुरी येथील श्री जगन्नाथ संस्कृत विद्यापीठाबरोबर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला संबलपूर विद्यापीठाशी जोडण्यात येणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com