ऊसदराचा प्रश्न शांततेच्या मार्गाने सोडवू - सुभाष देशमुख

ऊसदराचा प्रश्न शांततेच्या मार्गाने सोडवू - सुभाष देशमुख

मुंबई - ऊसदरावरून शेवगाव येथे झालेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी उग्र आंदोलन करू नये, शांततेच्या मार्गाने ऊसदराचा प्रश्न सोडवू, असे आवाहन ऊस उत्पादक शेतकरी आणि शेतकरी संघटनांना सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी बुधवारी केले. तसेच राज्य सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीचा लाभ आतापर्यंत राज्यातील 55 हजार शेतकऱ्यांना झाला असून, त्यांच्या खात्यांवर सुमारे 370 कोटी रुपये जमा झाले आहेत. तसेच नोव्हेंबरअखेर 80 टक्के शेतकऱ्यांची कर्जमाफी होईल, असेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले. ते मंत्रालयात पत्रकारांशी बोलत होते. 

या वेळी ते म्हणाले, की गेल्या वर्षीपेक्षा केंद्र सरकारने या वर्षी एफआरपीत अडीचशे रुपयांची वाढ केली आहे. राज्य सरकारचीही भूमिका ठाम आहे. साखर कारखान्यांनी एफआरपी दिलाच पाहिजे. एफआरपी देणे सर्वांना बंधनकारक आहे. जे साखर कारखाने एफआरपीनुसार दर देणार नाहीत, त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यावर सरकार ठाम आहे. कोल्हापूरच्या बैठकीत महसूलमंत्री चंद्रकात पाटील यांनी पुढाकार घेऊन ऊसदराचा फॉर्म्युला ठरवला आहे. पुण्यामध्येही अशीच बैठक झाली. उसाबाबत राज्यबंदी उठवावी, अशी मागणी होती. ती मान्य केली आहे. ऊसदराच्या बाबतीत झोनबंदीसुद्धा उठवली आहे. ऊसदरासंदर्भात साखर कारखान्यांना विविध सूचना दिल्या आहेत. साखर कारखान्यांच्या वजन काट्याबाबत संशय व्यक्त होत होता. त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली भरारी पथक तयार केले आहे. जिथे संशय आहे, तक्रारी आहेत त्या ठिकाणी नियमित तपासणी सुरू आहे. त्यामुळे ऊसदराचा प्रश्नही चर्चेने सोडवला जाईल. सर्वांना विनंती आहे, की चर्चा करून निर्णय घ्यावा. जाळपोळ करून राष्ट्रीय संपत्तीचे नुकसान करू नये.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com