नाथाभाऊंचे पुनर्वसन शक्यच नाही: मुख्यमंत्री

Devendra Fadnavis
Devendra Fadnavis

नागपूर - एकनाथ खडसे यांचे पुनर्वसन शक्य नाहीच. कारण, पुनर्वसन विस्थापितांचे होते. नाथाभाऊ प्रस्थापित नेते आहेत, अशी लोक पक्षासाठी अमूल्य असतात, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.

एकनाथ खडसे यांच्यावर झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे सध्या ते मंत्रिमंडळातून बाहेर आहेत. त्यांनी अनेकवेळा याबद्दल नाराजी दर्शविलेली आहे. याविषयी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, की नाथाभाऊ प्रस्थापित नेते आहेत. नारायण राणेंचे पुनर्वसन होणार असून, ते आमच्यासोबत आहेत. खडसे, राणे आऊटस्पोकन असण्यापेक्षा अनुभव मोठा असतो. 
राणेंना आमच्या कोट्यातून मंत्रिमंडळात घेणार असून, त्यामुळे शिवसेनेचा विरोधाचा प्रश्न नाही.

गुजरातमध्ये भाजपला 49.4 टक्के मत मिळाली. देशाच्या राजकारणात विधानसभेत 50 टक्के मते मिळवणारे सरकार कमी आहेत. विजय अभूतपूर्व होता. काँग्रेस भाजपमध्ये 9 टक्क्यांचा फरक आहे. भाजपला कन्व्हेंसिंग विजय मिळाला असून, विजयामुळे महाराष्ट्रात आम्ही अजून स्थिर झालो. अनेक लोक वातावरण तयार झाल्यामुळे कोलांत उड्या मारत होते. सातत्याने महाराष्ट्रात भाजप पहिल्या नंबरचा पक्ष 2016 पासून निवडणुकांत आम्हाला यश मिळतेय. इतर सर्व पक्षांविरोधात अनेक ठिकाणी आमचा विजय झाला आहे. तिन्ही पक्ष समोर असताना विजय मिळविला. पक्ष मजबूत होतोय. अजूनही काँग्रेस राष्ट्रवादीकडे जाण्याची मानसिकता अजूनही नाही, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com