राज्यातील 4175 अपूर्ण पाणी पुरवठा योजनांचे काम पूर्ण: बबनराव लोणीकर

Babanrao Lonikar
Babanrao Lonikar

मुंबई : राज्यातील 4175 अपूर्ण पाणी पुरवठा योजनांचे काम पूर्ण करण्यात आल्याची माहिती पाणी पुरवठा व स्वछता मंत्री बबनराव लोणीकर यांनी आज विधानसभेत दिली.प्रश्नोत्तराच्या तासात सदस्य डॉ. अशोक उईके यांनी करळगाव येथील पाणीपुरवठा योजनेचे काम पूर्ण झाले नसल्याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. यावेळी झालेल्या चर्चेत राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे, आमदार सत्यजित पाटील यांनी सहभाग घेतला.

बबनराव लोणीकर म्हणाले की, "राज्यभरात उपविभागीय कार्यालयस्तरावर पाणी तपासणी प्रयोगशाळा सुरू करण्यात आल्या असून ग्रामपंचायतींना पाणी तपासणी बंधनकारक करण्यात आले आहे. ग्रामीण पाणी पुरवठ्यासाठी सरकार सातत्याने प्रयत्नशिल आहे. करळगाव जि. यवतमाळ येथी पाणीपुरवठा योजनेचे काम 40 टक्के झाले आहे. उर्वरित काम मार्च अखेर पूर्ण करण्यात येईल.

राज्यात 4175 पाणी पुरवठ्याच्या योजना अपूर्ण होत्या. त्या संदर्भात विभागीय बैठका घेऊन पूर्ण करण्यात आली आहेत. त्यामुळे 5121 गावांना फायदा झाला आहे. तीन वर्षात या कामांसाठी 2749 कोटी रुपये खर्च करण्यात आले असल्याचे बबनराव लोणीकर यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com