अजित पवार आणि सुभाष देशमुख यांच्यात रंगला कलगीतुरा

vidhan bhawan
vidhan bhawan

मुंबई : तुमच्या काळातलं काहीही बोललं मागचं का काढता म्हणता अन् आमचं मात्र सगळं काडता असा तक्रारीचा सुर सुभाष देशमुख यांनी लावताच. बसल्या जागेवरूनच अजित पवार म्हणाले, " आम्ही काढणारच ! तुम्ही सरकारमधेयं आमी बोलणारच ! " 

विधानसभेत सहकार मंत्री सुभाष देशमुख आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यात कलगीतुरा रंगला. विरोधी पक्षाच्या वतीने नियम 293 अन्वये मांडण्यात आलेल्या प्रस्तावाला उत्तर देताना सुभाष देशमुख बोलत होते.

सुभाष देशमुख म्हणाले, "राज्यातील 89 लाख शेतकऱ्यांमध्ये पात्र अपात्र शेतकरी आपण ठरवले आहेत. निकषानुसार आँन लाईन 77 हजार 29 हजार शेतकऱ्यांनी फाँर्म भरले आहेत. शेतकऱ्यांचे कौतुकचं आहे. शेतकऱ्यांनी भरलेली माहिती बँकेला न देता, बँकेकडून यादी मागून घेतली. पहिल्या यादीनुसार 55 लाख शेतकऱ्यांची यादी बँककडे दिली आहे. 46 लाख 52 हजार शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा केले आहेत. 
माझ्या माहितीनुसार 2008 ची कर्जमाफी ही व निवडणुक डोळ्यासमोर ठेवून केली होती. मात्र, आम्ही कर्जमाफी शेतकरी डोळ्यासमोर ठेवून केली आहे. 35 लाख शेतकऱ्यांच्या 13 हजार कोटी रूपये आत्तापर्यंत जमा केले असल्याचे सुभाष देशमुख यांनी सांगितले.

सुभाष देशमुख पुढे म्हणाले, "शेतकऱ्यांच्या यादीची सिडीच्या स्वरूपात पटलावर ठेवण्यात येईल. तुमच्या काळातलं काहीही बोललं मागचं का काढता म्हणता अन् आमचं मात्र सगळं काढता असा तक्रारीचा सुर सुभाष देशमुख यांनी लावताच. बसल्या जागेवरूनच अजित पवार म्हणाले, " आम्ही काढणारच ! तुम्ही सरकारमधेयं आमी बोलणारच ! " 

त्यावर पलटवार करत सुभाष देशमुख म्हणाले, "तुमी बोला पण आमीच शेतकऱ्यांना न्याय देणार. शेतकऱ्यांचे सगळे प्रश्न आम्ही सोडवणारच ! असा निर्धार सुभाष देशमुख यांनी व्यक्त केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com