तूरखरेदीची मर्यादा आता किमान 10 क्विंटलपर्यंत 

तूरखरेदीची मर्यादा आता किमान 10 क्विंटलपर्यंत 

मुंबई - तूरखरेदीची मर्यादा आता हेक्‍टरी किमान 10 क्विंटलपर्यंत करण्यात आली आहे. यासंबंधीचे निर्देश पणन विभागाने तूरखरेदी करणाऱ्या राज्य सहकारी पणन महासंघ, नाफेड, विदर्भ सहकारी पणन महासंघ आदी सर्व एजन्सीना दिले आहेत. 

पणन विभागाने दिलेल्या माहितीनुसार- तुरीची उत्पादकता प्रतिहेक्‍टर क्विंटलपेक्षा कमी आहे अशा जिल्ह्यात 10 क्विंटल व ज्या जिल्ह्यात 10 क्विंटलपेक्षा जास्त प्रतिहेक्‍टर उत्पादकता आहे, त्या जिल्ह्यात महसूल मंडळातील उच्चतम उत्पादकतेचे प्रयोग गृहीत धरून प्राप्त झालेल्या सरासरी उत्पादकतेनुसार शेतकऱ्यांकडून तूरखरेदी करण्यात येईल. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com