मंत्र्यांनो, आजच दालनांची आवराआवर करा; आदेश निघाला

mantralaya
mantralaya

मुंबई : देवेंद्र फडणवीस यांनी आठ नोव्हेंबर रोजी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर काल पर्यंत ते काळजीवाहू मुख्यमंत्री होते. मात्र, काल पर्यंत कोणीही सरकार स्थापन करण्याचा दावा न केल्याने राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. त्यामुळे आता मंत्र्यांची दालने ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.

काही वेळापूर्वीच सामान्य प्रशासन विभागाने आदेश जारी केला आहे. त्यात मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्र्यांची दालने ताब्यात घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच या कार्यालयांतील कागदपत्रे, नोंदवह्या, फर्निचर यांचीही आवराआवर करण्याचे आदेश आस्थापना विभागाचे उपचसिव तसेच मुख्यमंत्री सचीवालय, मंत्री व राज्यमंत्र्यांचे खासगी सचीव आणि ओएसडी यांना देण्यात आले आहेत. 

आज सायंकाळी ही दालने साफसफाई करुन त्यांचा ताबा सामान्य प्रशासन विभागाकडे द्यायचा आहे. या खात्यांचे मंत्री, त्याचे प्रवासखर्च, घेतलेला अॅडव्हान्स यांचाही तपशील सामान्य प्रशासन विभागाकडे द्यायचा आहे. सर्व मंत्र्यांच्या कार्यालयातले अधिकारी व कर्मचारी यांना सामान्य प्रशासन विभागाने दिलेली ओळखपत्रेही सामान्य प्रशासन विभागाकडे जमा करावयाची आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com