Vidhan Sabha 2019 : शिवसेनेला धक्का; तीनवेळा आमदार राहिलेला नेता करणार बंडखोरी?

4shivsena
4shivsena

नागपूर : नागपूर जिल्ह्यातील रामटेक विधानसभा मतदारसंघ युतीमध्ये शिवसेनेसाठी सोडला जाणार नाही, अशी माहिती आहे. त्यामुळे रामटेकमधून तीन वेळा निवडून आलेले शिवसेनेचे माजी आमदार आशिष जयस्वाल बंडखोरी करून अपक्ष लढण्याच्या तयारीत आहेत. 

2014 मध्ये भाजप आणि शिवसेना स्वतंत्रपणे लढले होते, त्या वेळी भाजपचे डी. मल्लिकार्जुन रेड्डी यांनी त्यांचा पराभव केला होता. पराभूत झाल्यानंतरही जयस्वाल यांनी मतदारांशी संपर्क तोडलेला नाही आणि जनसंपर्क कायम ठेवत मतदारसंघाची बांधणी केली. सध्या ते महाराष्ट्र राज्य खनिकर्म महामंडळाचे अध्यक्ष आहेत. या संदर्भात विचारणा केली असता जयस्वाल म्हणाले, ""तीन वेळा आमदार झालो; पण कोणताही डाग स्वतःवर किंवा पक्षाला लागेल, अशी कृती केली नाही.

युतीमध्ये रामटेक शिवसेनेसाठी सुटेल, असा विश्‍वास आहे. अजूनही आशा सोडलेली नाही. पण, जर शिवसेनेला रामटेक मिळाला नाही, तर कार्यकर्त्यांचे मत जाणून घेऊन जनतेच्या भावनांचा विचार करू. त्यानंतर येत्या 2 ऑक्‍टोबरला भूमिका स्पष्ट करून निर्णय जाहीर करू.''

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com