जल्द बने गी महाराष्ट्र में जन के मन की सरकार : नवाब मलिक

Untitled-2.jpg
Untitled-2.jpg

मुंबई : शिवसेना नेते संजय राऊत ज्याप्रमाणे व्टिट करत रोज भाजपला परेशान करत आहेत त्याचप्रमाणे आज राष्ट्रवादीचे नेते प्रवक्ते नवाब मलिक यांनी एक व्टिट करत भाजपवर निशाणा साधला आहे.

दरम्यान, सध्या महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. विधानसभेचा निकाल लागून एक महिना उलटला तरी सत्तास्थापनेचा कोणीही दावा केलेला नाही. परंतू दिल्लीत मागील दोन दिवसांत घडलेल्या घडामोडींमुळे लवकरच शिवसेना, काॅग्रेस, राष्ट्रवादी यांची महाविकास आघाडी सत्तास्थापनेचा दावा करणार आहे.

या मागील एक महिण्याचा कालावधीत शिवसेना नेते संजय राऊत रोज काहीतरी व्टिट करत भाजपवर निशाणा साधत होते. अशाच प्रकारे राष्ट्रवादीचे नेते प्रवक्ते नवाब मलिक यांनी एक व्टिट करत भाजपवर निशाणा साधला आहे.

त्यांनी आपल्या व्टिटमध्ये म्हटले आहे की, सच को में ने सच कहा, जब कह दिया तो कह दिया, अब ज़माने की नज़र में ये हिमाकत है तो है। जल्द बनेगी महाराष्ट्र में जन के मन की सरकार, जय हिंद, जय महाराष्ट्र। 

आता लवकरच महाराष्ट्रात जनतेचे सरकार दिसेल असे त्यांनी सुचविल् आहे. आज संजय राऊत यांनी देखील व्टिट करत अहंकारी भाजपपासून नाते तोडले हे बरे झाले. अहंकारी नाते काही उपयोगाचे नसते असे व्टिट त्यांनी करत परत एकदा भाजपला टारगेट केले आहे.             

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com