शेतकऱ्यांसाठी मनसेचा २७ रोजी दंडुका मोर्चा

शेतकऱ्यांसाठी मनसेचा २७ रोजी दंडुका मोर्चा

मुंबई - राज्यातील बहुतांश भागांत दुष्काळ पडला आहे. राज्य सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत आहे. आता सरकारचे डोके ठिकाणावर आणण्याची गरज असून, त्यासाठी हातात दंडुका घ्यायला लागणार असल्याचा आक्रमक इशारा मनसेने पत्रकार परिषदेत दिला. सरकारचे लक्ष वेधण्यासाठी मनसेद्वारे २७ नोव्हेंबरला औरंगाबादमध्ये दंडुका मोर्चा काढण्यात येणार आहे.

मनसेच्या राजगड कार्यालयात पार पडलेल्या पत्रकार परिषदेत मनसे सरचिटणीस अनिल शिदोरे, नेते नितीन सरदेसाई, शिरीष सावंत उपस्थित होते. राज्य सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे कसे दुर्लक्ष करत आहे याविषयी पत्रकार परिषदेत भाष्य करण्यात आले. सरकारतर्फे विविध तालुक्‍यांत नुकताच दुष्काळ जाहीर करण्यात आला. मुख्यमंत्र्यांनी तालुक्‍यात दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर न करता थेट दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी विरोधकांकडून होऊ लागली. राज्य सरकारने दुष्काळ जाहीर केला असला तरी त्यावर कोणत्याच उपाययोजना करण्यात आल्या नसल्याचा आरोप मनसेने केला आहे. याविरोधात राज्यव्यापी आंदोलन करण्यात येणार आहे. २७ नोव्हेंबरला औरंगाबादमध्ये दंडुका मोर्चा काढण्यात येईल. हा मोर्चा नंतर राज्यव्यापी होणार असल्याचे या वेळी जाहीर करण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com