दुष्काळामुळे सावकारांनी नाकारला परवाना

Money-Lenders
Money-Lenders

सोलापूर - जिल्हा बॅंका अडचणीत अन्‌ राष्ट्रीयकृत बॅंकांचा कर्जवाटपात हात आखडता, या कारणांमुळे बऱ्याच बळिराजाला खासगी सावकारांचा दरवाजा ठोठावावा लागतो. २०१५ ते २०१८ पर्यंत राज्यात सरासरी साडेबारा हजार खासगी सावकार होते. मात्र, मागील वर्षीचा दुष्काळ अन्‌ उत्पन्नात झालेली घट पाहून या वर्षी राज्यातील सहा हजार ५४८ खासगी सावकारांनी परवान्याचे नूतनीकरण केलेच नाही. 

दुष्काळ, नापिकी, हमीभाव नाही, अशा विविध कारणांमुळे बॅंकांच्या थकबाकीप्रमाणेच खासगी सावकारांचीही थकबाकी वाढली. अनेक सावकारांनी शेतकऱ्यांच्या जमिनी खरेदी करून घेतल्या आहेत. राज्यातील जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे अशा तक्रारींत वाढ झाली आहे. जिल्हा उपनिबंधकांनी नूतनीकरणाचे पत्र पाठवूनही कर्ज देऊन पुन्हा कायद्याच्या कचाट्यात अडकण्यापेक्षा परवानाच न घेतलेला बरा, असे म्हणत यंदा चार हजार ५१६ सावकारांनी परवान्याचे नूतनीकरण केलेले नाही. या मागे दुष्काळामुळे उत्पन्न नाही, वसुली ठप्प आणि शेतकरी आत्महत्या ही कारणे असू शकतात. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा सहा हजार ५४८ खासगी सावकारांनी परवान्याचे नूतनीकरण केले आहे. त्यामध्ये नव्या ५५९ सावकारांचा समावेश झाला आहे, असे उपनिबंधक प्रदीप बर्गे यांनी सांगितले.

राज्यातील खासगी सावकार 
१२,७३१ एकूण संख्या (२०१८ मधील)
६,५४८ या वर्षीची संख्या
४,५१६ परवाना नूतनीकरण न केलेले
५५९ नव्याने परवाना घेतलेले सावकार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com