महाराष्ट्रासह देशभरातून मॉन्सूचा निरोप

महाराष्ट्रासह देशभरातून मॉन्सूचा निरोप

पुणे - नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) बुधवारी (ता.१६) महाराष्ट्रासह संपुर्ण देशाचा निरोप घेतला आहे. दक्षिण भारतातील केरळ, आंध्रप्रदेश, तामिळनाडू, कर्नाटकमध्ये ईशान्य मॉन्सून सक्रीय झाल्याचे हवामान विभागाने जाहीर केले. यंदा केरळमध्ये ८ जून रोजी दाखल झालेल्या मॉन्सूनने तब्बल चार महिन्यापेक्षा अधिक काळ देशाच्या विविध भागात मुक्काम केला. यंदा ९ ऑक्टोबर रोजी राजस्थानातून प्रवास सुरू करणाऱ्या मॉन्सूनने आठवडाभरत परतीचा प्रवास पुर्ण केला आहे.  

वायव्य भारतातील हवेच्या खालच्या थरात केंद्रभागी दाब अधिक असलेली चक्राकार वाऱ्यांची स्थिती (ॲण्टी सायक्लोनीक सर्कुलेशन) होऊन, पावसाची उधडीप असल्यानंतर राजस्थानातून परतीचा प्रवास सुरू झाल्याने जाहीर करण्यात येते. त्यांनतर सलग पाच दिवस पावसाची उघडीप, सकाळच्या वेळी हवेतील बाष्पाचे कमी झालेले प्रमाण, वाऱ्यांची बदलेली दिशा आदी निरिक्षणानंतर मॉन्सूनने देशाच्या विविध भागातील परतीची वाटचाल ठरते. महाराष्ट्रातून मॉन्सून परतल्यानंतर देशभरातून मॉन्सून परतल्याचे, तसेच दक्षिण भारतात इशान्य मोसमी वारे (ईशान्य मॉन्सून) सक्रीय झाल्याचे जाहीर केले जाते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com