स्वाभिमानीची पुण्यात धडक

स्वाभिमानीची पुण्यात धडक

पुणे - राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची थकविलेली साडेपाच हजार कोटी रुपयांची एफआरपी मिळण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख खासदार राजू शेट्टी यांनी हजारो शेतकऱ्यांसह साखर आयुक्तालयावर मोर्चा नेला. एफआरपी मिळेपर्यंत आयुक्तालयासमोरून हलणार नाही, असा निर्धार करीत स्वाभिमानीने ठिय्या आंदोलन सुरू केल्यामुळे सरकारी यंत्रणेची त्रेधातिरपीट उडाली. 

पुण्यात अलका टॉकिजपासून दुपारी दोन वाजता खासदार शेट्टी यांनी मोर्चाला सुरवात केली. राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो शेतकरी सहभागी झाले होते. शेतकरी स्वतःला आसूड मारून थकीत एफआरपीबाबत निषेध व्यक्त करीत होते.  खासदार शेट्टी यांच्यासह योगेंद्र यादव यांच्यासह रविकांत तुपकर, प्रकाश पोकळे, योगेश पांडे, अनिल पवार व राज्यभरातील स्वाभिमानीचे नेते मोर्चात सहभागी झाले. साखर आयुक्तालयाच्या बाजूला असलेल्या कृषिभवनासमोरच पोलिसांनी मोर्चा अडविला. कायद्यानुसार १४ दिवसांत एफआरपी न दिल्यास कारखान्यांवर जप्तीची कारवाई झाली असती. मात्र, तसे झालेले नाही. त्यामुळे साखर जप्त करून शेतकऱ्यांचे पैसे द्यावेत. त्याशिवाय आम्ही हलणार नाही, असे खा. शेट्टी यांनी घोषित केले. 

दीड हजार कोटी लगेच मिळणे शक्य
"एफआरपीचे पेमेंट १०० टक्के करायचे की ८० टक्के असा वाद कोल्हापूर, सातारा, सांगली भागांतील ३० कारखान्यांमध्ये आहे. हा वाद मिटताच किमान दीड हजार कोटी लगेच शेतकऱ्यांना मिळतील. आरआरसीची कारवाई सुरू होताच किमान ३-४ हजार कोटी रुपये शेतकऱ्यांना मिळणे शक्य आहे", असे आयुक्त म्हणाले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com