मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनला लागणार 'ब्रेक'?

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनला लागणार 'ब्रेक'?

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा "ड्रीम प्रोजेक्‍ट' म्हणून ओळखला जाणारा मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पातून नवीन सरकार काढता पाय घेण्याचे संकेत असून, राज्याच्या वाट्याचा निधी शेतकरी कर्जमाफीसाठी वापरण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. 

सुमारे 1 लाख 10 हजार कोटी रुपयांच्या या प्रकल्पात महाराष्ट्राला 50 टक्‍के निधी उभारायचा आहे. मात्र, या प्रकल्पाचा महाराष्ट्रापेक्षा गुजरातलाच सर्वाधिक फायदा होणार असल्याने या प्रकल्पाला महाराष्ट्राच्या तिजोरीतून निधी देऊ नये, अशी चर्चा शिवसेना-राष्ट्रवादी-कॉंग्रेस या नव्या आघाडीत झाल्याचे सूत्रांनी सांगितले. नव्या सरकारच्या किमान समान कार्यक्रमात या मुद्याचा समावेश करण्यात आल्याचा दावाही सूत्रांनी केला आहे.

मुंबई-अहमदाबाद या 505 किलोमीटरच्या मार्गावर देशातली पहिली बुलेट ट्रेन सुरू करण्यात येणार आहे. ही बुलेट ट्रेन महाराष्ट्रावर अन्याय करणारी असून, गुजरातचाच सर्वाधिक लाभ यामध्ये होणार असल्याची भूमिका या तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी मांडली होती. या मार्गावरील 12 पैकी केवळ चार स्थानके महाराष्ट्रात राहणार आहेत तर 75 हजार हेक्‍टर जमीन महाराष्ट्राची संपादित केली जाणार आहे.

सामान्य नागरिकांसाठी या रेल्वेगाडीचे प्रवास भाडेदेखील परवडणारे नसल्याने या प्रकल्पाला या पक्षांचा सुरवातीपासून विरोध राहिलेला आहे. महाराष्ट्राच्या निधीतून गुजरातचा विकास करण्याचा या प्रकार असल्याची टीका कॉंग्रेसच्या नेत्यांनी वारंवार केली होती, तर बुलेट ट्रेन रद्द करण्याची मागणी शिवसेनेची आहे. 

बुलेट ट्रेनविषयी किमान समान कार्यक्रम

- महाराष्ट्राला लाभ होणार नसेल तर राज्याचा निधी देऊ नये 
- खर्चाचा भार केंद्र व गुजरात सरकारने उचलावा 
- महाराष्ट्र सरकार त्यासाठी निधी देणार नाही 
- तरतुदीतील निधी शेतकरी कर्जमाफी व नुकसानभरपाईसाठी वापरावा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com