Mumbai-Goa Highway
Mumbai-Goa Highwayesakal

Mumbai-Goa Highway: १८ हजार बळी घेणारा महामार्ग; संतापलेल्या 'पेण'करांनी...

मुंबईः मुंबई-गोवा या महामार्गाने आतापर्यंत १८ हजार बळी घेतलेले आहे. मागील १२ वर्षांपासून या रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम सुरुय. अतिशय धिम्या गतीनं सुरु असलेल्या या कामामुळे नेहमीच अपघात होत आहेत.

मंबई-गोवा या महामार्गावर कायम वाहतूककोंडी असते. १२ वर्षांपासून या रस्त्याचं काम सुरु आहे. पण ते पूर्णत्वास जात नाही. या रस्त्याला वैतागलेल्या कोकणवासियांनी आज रास्ता रोको आंदोलन केलं. मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक अडवून पेणकरांनी प्रशासनाला इशारा दिला आहे.

कामाला दिरंगाई करणाऱ्या गुत्तेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे. 'माझं पेण' या सामाजिक संस्थेच्या वतीने संघटनेच्या वतीने आज (रविवार) रास्ता रोको आंदोलन करण्यात येतय. या आंदोलनात पेण तालुक्यातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेले असल्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढलेले आहे.

कोकण आणि रायगडवासियांची थट्टा थांबवून, १८ हजार बळी घेणाऱ्यावर जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी आंदोलकांनी केली. शिवाय हा रस्ता सिमेंटचा करावा, अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली. या आंदोलनामध्ये यमराजाच्या 'अवतारा'मध्ये आंदोलक सहभागी झाले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com