मुंबई- राज्यातील दहा महानगरपालिकांसाठी 21 फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून, 23 फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार आहे, आचारसंहिता आजपासून लागू होत आहे, अशी माहिती राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया आज (बुधवार) दुपारी चार वाजता पत्रकार परिषदेत दिली.
मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड, ठाणे, उल्हासनगर, नाशिक, नागपूर, अकोला, अमरावती व सोलापूर या दहा महानगरपालिकसांठी 21 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. राज्यातील 10 महानगर पालिका, 25 जिल्हा परिषदा व 283 पंचायत समितीच्या निवडणूका होणार आहे. जिल्हा परिषदांसाठी दोन टप्प्यांमध्ये मतदान होणार असून, पहिला टप्प्यात 15 जिल्हे व 165 पंचायत समिती असणार आहेत. दुसरा टप्प्यात 11 जिल्हे 118 पंचायत समिती निवडणुका होणार आहेत. 16 फेब्रुवारी रोजी 15 जिल्ह्यातील जिल्हा परिषदांसाठी मतदान होणार तर 21 फेब्रुवारीला दुसऱ्या टप्प्यातील जिल्हा परिषदांसाठी मतदान होणार आहे, असे सहारिया यांनी सांगितले.
राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांची पत्रकारर परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे-
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.