मुंबई - केंद्र सरकारच्या वतीने स्वच्छ शाळा पुरस्काराने गौरविण्यात आलेल्या देशभरातील 52 शाळांपैकी राज्यातील दोन शाळांनी बाजी मारली असून, पुरस्कारात अव्वल ठरलेल्या जिल्ह्यामध्ये लातूर जिल्ह्याचे नाव तिसऱ्या क्रमांकावर आले. या संदर्भात सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी समाधान व्यक्त केले.
विद्यार्थ्यांवर शालेय जीवनातच स्वच्छतेचे संस्कार रुजविण्यासाठी केंद्र सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या वतीने घेतलेल्या स्वच्छ शाळा राष्ट्रीय पुरस्कार विजेत्यांमध्ये लातूर जिल्ह्यातील जाऊ (ता. निलंगा) व बावची (ता. रेणापूर) येथील सामाजिक न्याय विभागाच्या मुलींच्या दोन शासकीय निवासी शाळा आहेत. या शाळांना प्रत्येकी 50 हजार रुपयांचा पुरस्कार जाहीर झाला आहे. येत्या 18 सप्टेंबर रोजी नवी दिल्ली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्रांत या शाळांसोबत जिल्हा प्रशासनाचा पुरस्कार देऊन गौरव होणार असल्याचे बडोले यांनी सांगितले.
स्पर्धेत देशात अव्वल आलेल्या नऊ जिल्ह्यांचीही पुरस्कारासाठी निवड करण्यात आली असून, त्यात लातूर जिल्हा तिसऱ्या क्रमांकावर आहे.
- राजकुमार बडोले, सामाजिक न्यायमंत्री
पुरस्कारासाठी स्पर्धा
27,179 - राज्यातील शाळांची नोंदणी
20,602 - शाळांचा सहभाग
729 - देशातील पात्र शाळा
52 - शाळांचा निवड
|