राष्ट्रवादी काँग्रेसचा ‘राष्ट्रीय’ दर्जा धोक्‍यात

NCP
NCP

मुंबई - लोकसभेच्या सलग दोन निवडणुकांत झालेला पराभव आणि निवडणूक आयोगाच्या नियमानुसार पुरेशी मते मिळाली नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेसची राष्ट्रीय पक्ष म्हणून मिळालेली मान्यता धोक्‍यात आली आहे.

१९९९ साली शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली होती. त्याच सालात झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पक्षाला भरघोस मतदान झाले होते. ‘राष्ट्रवादी’ने काँग्रेससोबत आघाडी करून केंद्र आणि राज्यात सत्ता स्थापन केली होती. २००४ आणि २००९ मध्ये झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतही पक्षाने स्वतःचे अस्तित्व कायम राखले होते. प्रत्येक वेळी आठ किंवा नऊ खासदार आणि अन्य राज्यांतील विधानसभा निवडणुकीत ‘राष्ट्रवादी’चे आमदार निवडून आल्याने पक्षाला राष्ट्रीय पक्षाची मान्यता मिळाली होती. मात्र, २०१४ आणि २०१९ सालात झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पक्षाची जोरदार पीछेहाट झाली. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या कायद्यातील तरतुदीनुसार पक्षाला मतांचा टक्‍का राखता आला नाही. या पार्श्‍वभूमीवर तुमचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काढून का घेऊ नये, अशी नोटीसच निवडणूक आयोगाने राष्ट्रवादीला बजावली आहे. तृणमूल काँग्रेस आणि भाकपलाही अशीच नोटीस पाठविण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com