बालाकोट तो झाँकी है, इम्रान खान बाकी है: आव्हाड (व्हिडिओ)

Jitendra Awhad
Jitendra Awhad

मुंबई : पाकिस्तानमध्ये भारतीय हवाई दलाने केलेल्या कारवाईचा अभिमान आहे. लष्कराने आपली शौर्यगाथा कायम ठेवत बालाकोटमधील दहशतवाद्यांची तळे उद्ध्वस्त करून टाकली. भारतीय हवाई दलाच्या शौर्याला सलाम. मी आता एवढेच म्हणेन बालाकोट तो झाँकी है, अब इम्रान खान बाकी है, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.

भारताचे लढाऊ विमान असलेल्या मिराज या 12 विमानांनी प्रत्यक्ष नियंत्रण रेषा (एलओसी) ओलांडून पाकिस्तानमधील बालाकोट परिसरात तब्बल 1 हजार किलोचे बॉम्ब टाकले. बालाकोट, मुझफ्फराबाद येथे हल्ला करत जैशे महंमद या दहशतवादी संघटनेचा कंट्रोल रुम उद्ध्वस्त करण्यात आले. या कारवाईत सुमारे 300 दहशतवादी ठार झाल्याची शक्यता आहे.

या हल्ल्यानंतर आव्हाड म्हणाले, की भारतीय सैन्य आणि शौर्य याचे एक नाते आहे. 1965, 1971 चे युद्धात आपले सैन्य कराचीपर्यंत घुसले होते. एक लाख पाकिस्तान सैन्याला गुघड्यावर आणले आणि पाकिस्तानचे दोन तुकडे केले. आपल्या लष्करासारखे कोणी काम करू शकत नाही. अमेरिकेलाही हे जमले नाही. आज भारताने आपल्या शौर्याला साजेसे काम केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com