मुंबई : खिशात नाही दमडी आणि गाव जेवणाची पिटतोड दवंडी. निवडणुका जिंकण्यासाठी परत हे कर्ज काढणार, उद्या सर्वसामान्य व्याजाच्या ओझ्याखाली भरडला जाणार आणि मोदी शेठ आपल्याला येडं समजणार, अशी खरमरीत टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.
अख्खा देश 'इलेक्शन' मोडमध्ये गेला असताना अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केलेल्या पूर्वअंदाजानुसार हंगामी अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी यंदाचा अर्थसंकल्प संसदेच्या पटलावर सादर करताना घोषणांचा अक्षरश: पाऊस पाडला. दुष्काळात होरपळणाऱ्या बळिराजाला सहा हजार रुपयांचा 'वार्षिक सन्मान निधी' देतानाच कामगारांना 'श्रमयोगी मानधन' जाहीर केले. भाजपची पारंपरिक मतपेढी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मध्यमवर्गाला अर्थमंत्र्यांनी दिलासा देत वार्षिक पाच लाख रुपयांपर्यंतच्या करपात्र उत्पन्नावर आता प्राप्तिकर आकारला जाणार नसल्याची "गूड न्यूज' दिली. नुकत्याच झालेल्या तीन राज्यांतील विधानसभा निवडणुकांमध्ये आलेले अपयश आणि विरोधकांच्या तीव्र होत चाललेल्या हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी सरकारने हात सैल सोडत 'होऊ दे खर्च'चे धोरण अंगिकारले. यावरून आव्हाड यांनी मोदी सरकारला लक्ष्य केले आहे.
आव्हाड यांनी ट्विट करत म्हटले आहे, की खिशात नाही दमडी आणि गाव जेवणाची पिटतोय दवंडी. खिशात दोन रुपये बी नाय, काय आता वरून पैशाचा पाऊस पडणार हाय. मोदी शेठ आपल्याला येडं समजणार. या ट्विटमध्ये त्यांनी अर्थबजेटचा हा हॅशटॅगही वापरला आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.