भारनियमन बंद करुन दुष्काळ जाहीर करा- अजित पवार

भारनियमन बंद करुन दुष्काळ जाहीर करा- अजित पवार

मुंबई- राज्यात भिषण दुष्काळाची परिस्थीती आहे. राज्यातील भारनियमन बंद करून त्वरित दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्य सरकारकडे केली आहे. तसेच, शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार मदत देण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे घेण्यात आलेल्या एका पत्रकार परिषदेदरम्यान ते बोलत होते. 

यावेळी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक आदी राष्ट्रवादीचे नेते उपस्थित होते. राज्यात 1972 या वर्षीपेक्षाही भीषण दुष्काळ आहे. त्यामुळे आता निकषांची वाट पाहत बसण्यापेक्षा सरकारने दुष्काळ जाहीर करायला हवा. केंद्राच्या समितीकडे डोळे लावून वेळकाढूपणा करू नका. विशेष विमानानं पथकाला आणा. असा सल्लाही यावेळी असे अजित पवार यांनी दिला.

तसेच, पुढे धनंजय मुंडेनी बोलताना सरकारच्या धोरणावर टीका केली. जलयुक्त शिवारमुळे 17 हजार गावे दुष्काळमुक्त झाल्याचा पंतप्रधान मोदी यांचा दावा खोटा आहे, असे ते यावेळी म्हणाले. जलयुक्त शिवार योजना बोगस असल्याचे सिध्द झाले आहे. जीएसडीएचा अहवाल जलयुक्त फसल्याचे सिध्द होतेयं. साडेसात हजार कोटीचा हिशोब सरकारने जनतेला द्यायला हवा. सरकारने जनतेला फसवले आहे त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी माफी मागितली पाहिजे असे मत धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com